शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल, समितीकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:29 IST

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

जयंत धुळपअलिबाग : राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये कोकण विभागाने लक्षणीय कामगिरी केली आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित बारापैकी आठ स्थानिक स्वराज्य संस्थांनी हागणदारीमुक्तीची घोषणा करणारे ठराव केले आहेत. त्यांची जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समितीकडून तपासणी सुरु असल्याची माहिती राज्याच्या नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्ररीत्या कार्यरत स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाच्या सूत्रांनी दिली आहे.कोकण विभागातील एकूण ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये २० हजार ३८३ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १५ हजार ६ शौचालयाची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३ हजार २३९ शौचालयांचे बांधकामे प्रगतिपथावर आहेत. कोकण विभागाने शौचालये बांधकामाचे ७३.६२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून जूनअखेर १०० टक्के शौचालये पूर्ण होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा ९५.२८ टक्के उद्दिष्टपूर्तीसह आघाडीवर असून ठाणे ९४.२२ टक्के, पालघर ७७.४२ टक्के, सिंधुदुर्ग ७१.७२ टक्के व रायगड जिल्ह्याने ६०.२८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संपूर्ण विभागात सिंधुदुर्ग व ठाणे हे जिल्हे पूर्णपणे हागणदारीमुक्त झाले आहेत.राज्यामध्ये एकूण ११ जिल्हे आता पर्यंत हागणदारीमुक्त झाले आहेत. त्यापैकी कोकण विभागातील ५ जिल्ह्यांपैकी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. राज्यातील गुणानुक्र मांकानुसार पहिल्या १५ जिल्ह्यामध्ये कोकण विभागातील सर्व ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण विभागातील एकूण ४५ तालुक्यांपैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. कोकण विभागातील एकूण २ हजार ९६८ ग्रामपंचायतींपैकी २ हजार ७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. २३१ ग्रामपंचायती शिल्लक आहेत. २०१२ च्या बेसलाइन सर्वेनुसार एकूण १३ लाख ३१ हजार ५६१ कुटुंब संख्या आहे. ३१ मे २०१७ अखेर वैयक्तिक शौचालय असलेली एकूण १२ लाख ६० हजार ९६२ कुटुंब संख्या आहे.देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता शहरांना स्वच्छतेची आणि शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देशात हे अभियान राबविण्यात येणार आहे.अंमलबजावणीसाठी स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयाची निर्मितीमहाराष्ट्रात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगरविकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्र म राज्यात सुरु आहेत. यामुळे शहरे स्वच्छ होत आहेत. शौचालयांची निर्मिती होत आहे. शासकीय पातळीबरोबरच सामाजिक संस्था, लोकसहभाग स्वच्छ महाराष्ट्रासाठी प्रयत्न करत आहेत. स्वच्छ महाराष्ट्र हे आता अभियान राहिले नसून तिला चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.