शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्यात नेण्याचा डाव फसला : गाळवणकर

By admin | Updated: October 16, 2014 00:07 IST

कोकण रेल्वेचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्याऐवजी गोव्यात

कुडाळ : कोकण रेल्वेचा वर्धापन दिन महाराष्ट्रात साजरा करण्याऐवजी गोव्यात साजरा करण्याच्या निमित्ताने कोकण रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रातून गोव्यात हलविण्याचा भानुदास तायल यांचा डाव के. आर. सी. एप्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी यांच्या हस्तक्षेपामुळे फसला, अशी माहिती केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दीड महिन्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर करून १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्याचे आदेश काढले. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यात मतदान आहे, याची कल्पना होती. परंतु १५ आॅक्टोबर हा दिवस गेली २० वर्षे कोकण रेल्वेचा वर्धापन दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना तसेच यावर्षी १५ आॅक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात मतदान असल्याचे माहीत असतानाही कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक भानुदास तायल यांनी त्याच दिवशी मडगाव येथे कोकण रेल्वेचा वर्धापन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला. सुभाष मळगी यांनी १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान असल्यामुळे त्याच दिवशी मडगाव येथे वर्धापन दिन साजरा करणे चुकीचे असल्याचे निवडणूक आयोगाला कळविले. कोकण रेल्वे प्रशासनाला हा निर्णय रद्द करण्याबाबत पत्र दिले. कारण कोकण रेल्वेचा वर्धापन दिन गोव्यात साजरा झाल्यास महाराष्ट्रातील कामगारांना गोव्यात उपस्थित रहावे लागेल. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण रेल्वे कामगारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार नाही. मतदानादिवशी अशाप्रकारचा निर्णय घेणे चुकीचे असल्याने या विषयामध्ये निवडणूक आयोगाने लक्ष घातल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने १५ आॅक्टोबर रोजी मडगाव येथे वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय रद्द केला. केआरसी एम्प्लॉईज युनियनच्या या भूमिकेमुळे कोकण रेल्वे कामगारांना मतदान करण्याचा हक्क मिळाला. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक तायल यांचा महाराष्ट्राविषयी असलेला व्देष पुन्हा पहायला मिळाला असल्याचे गाळवणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)