शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार

By admin | Updated: May 24, 2016 03:17 IST

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस असल्यास ताशी ४० किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे निर्देशही इंजिनचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग मंदावणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचणे असे प्रकार होऊन कोकण रेल्वे वारंवार विस्कळीत होते. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरलेली आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत दरड कोसळूनही कोकण रेल्वे विस्कळीत झालेली नाही, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात ४00 कर्मचारी कोकण रेल्वेमार्गावर तैनात होते. यंदा ९५0 कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. गस्त घालतानाच काही मार्गांवर २४ तास वॉचमनही ठेवण्यात येतील. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ हालचालींसाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बी. आर. एन.चे एस्कॅव्हेटर तयार ठेवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. प्रवासी ६६६.‘ङ्मल्ल‘ंल्ल१ं्र’६ं८.ूङ्मे किंवा १३९ डायल करून तसेच कोकण रेल्वेच्या १८00२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रेनच्या स्थितीची माहिती घेऊ शकतात. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत कोकण रेल्वेवरून चालणाऱ्या गाड्यांचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांद्वारे फुटप्लेट निरीक्षणही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) आपत्कालीन उपाययोजना एखादी दुर्घटना झाल्यास अ‍ॅक्सिडंट रिलिफ मेडिकल व्हॅन, मेडिकल व्हॅन तैनात ठेवण्यात येईल. लोको पायलट, स्टेशन मास्तर, फिल्ड अधिकाऱ्यांना मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. १0 जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू राहील.