शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विद्युतीकरण पूर्ण; कोकण रेल्वेवर आता नाही ‘धुरांच्या रेषा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 09:35 IST

गुरुवारपासून गाड्यांना विजेचे इंजिन, या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत.

मुंबई : भारतीय रेल्वेमार्गांवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम केले असून, देशातील सर्वांत मोठे रेल्वेचे विद्युतीकरण कोकण रेल्वेमार्गावर केले आहे. चाकरमान्यांच्या हक्काची असलेली कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या गुरुवारपासून कोकणात जाणाऱ्या  दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस आणि दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस पूर्णपणे विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.  कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आहे. 

या विद्युतीकरणासाठी एकूण १ हजार २८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते रोह्यापर्यत विद्युतीकरण असल्याने विद्युत्प्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना चालविण्यात येत होती. रोहा स्थानकांपुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेल इंजिन जोडून गाड्या मार्गस्थ कराव्या लागत होत्या; मात्र, आता विद्युतीकरण पूर्ण झाल्याने टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. 

कधी लागणार विद्युत इंजिन? आता टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, मंगला एक्स्प्रेस, २० सप्टेंबर रोजी मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, १५ ऑक्टोबर रोजी  जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस,  १ जानेवारी २०२३ रोजी  मुंबई-मेंगलोर एक्स्प्रेस या गाड्यांना विद्युत इंजिन लागणार आहे. 

मुंबई-कोकण मार्गावर अप-डाऊन एकूण गाड्या २० देशातून एकूण ३७ रेल्वेगाड्यांची वाहतूकरेल्वेच्या विद्युतीकरणाला २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयाची मंजुरीरत्नागिरी ते थिविम या दरम्यान विद्युतीकरण    ९७० कि.मी. लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपयांचा खर्च 

इंधनाची होणार बचत १२ डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होईल. इंधनावरही वर्षाला साधारणत १५० ते २०० कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे  प्रवाशांना प्रदूषणमुक्त वातावरणात रेल्वे प्रवास शक्य होणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे