शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोळी बांधवांना आश्वासने नको

By admin | Updated: July 11, 2017 03:42 IST

सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत. मात्र यापुढे हे चालू देणार नाही आणि म्हणून येत्या २७ जुलै २०१७ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे संविधानात हक्क असणाऱ्या सर्व आदिवासी जमाती एकत्रित येऊन शासनाला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी कोळी समाज संघटना कोकण विभाग प्रमुख महेंद्र चोगले यांनी केले आहे.अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील राममंदिराच्या पटांगणात रविवारी रेवस - बोडणी कोळी बांधवांच्या कार्यक्रमात चोगले बोलत होत. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते, आमचे केंद्रामध्ये सरकार आहे. महाराष्ट्रातील कोळी जमातीतील बांधवांनी आम्हाला निवडून दिल्यास पहिल्याच अधिवेशनात जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासने देऊन तीन वर्षे पूर्णे होऊ न सुध्दा आश्वासनाचा पूर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत. याचा उल्लेख भारतीय संविधानात आहे. महादेव कोळी ही जमात अस्तित्वात नाही. महादेव हे स्थळ वाचक नाव आहे. कोळी जमातीची रुढी परंपरा या महादेव कोळी जमातीच्या रुढी परंपरा म्हणून जाहीर केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १९५० पूर्वीच्या सर्वांच्या मूळ नोंदी या कोळी आदिवासी कोळी आहेत. परंतु ही परिस्थिती शासनाला व राजकीय पक्षांना माहीत असून सुध्दा या प्रश्नाकडे गेली ३५ वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण कोळी जमातीवर अन्याय केला असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी रत्नागिरी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सदस्य रमण पावसे व रायगड आदिवासी कोळी समाज समन्वय समिती जनार्दन पाटील व नारायण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.रेवस-पाली पदयात्रा मंडळ रेवस गाव अध्यक्ष धर्मा कोळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गणेश कोळी, नवनाथ कोळी, अंबर नाखवा, हरेश्वर कोळी, रंजित पेढवी, बी.एन.कोळी, डी.के.कोळी, दत्ता कोळी, मोरेश्वर नाखवा, गजानन कोळी व मंडळाचे सर्व पदाधिकारी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने रेवस-बोडणी परिसरातील कोळी बांधवांनी हजारोंच्या संख्येत राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना रजिस्टर पोस्टाने निवेदने पाठविली आहेत त्याबद्दल महेंद्र चोगले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत.