शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोळी बांधवांना आश्वासने नको

By admin | Updated: July 11, 2017 03:42 IST

सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत. मात्र यापुढे हे चालू देणार नाही आणि म्हणून येत्या २७ जुलै २०१७ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे संविधानात हक्क असणाऱ्या सर्व आदिवासी जमाती एकत्रित येऊन शासनाला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी कोळी समाज संघटना कोकण विभाग प्रमुख महेंद्र चोगले यांनी केले आहे.अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील राममंदिराच्या पटांगणात रविवारी रेवस - बोडणी कोळी बांधवांच्या कार्यक्रमात चोगले बोलत होत. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते, आमचे केंद्रामध्ये सरकार आहे. महाराष्ट्रातील कोळी जमातीतील बांधवांनी आम्हाला निवडून दिल्यास पहिल्याच अधिवेशनात जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासने देऊन तीन वर्षे पूर्णे होऊ न सुध्दा आश्वासनाचा पूर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत. याचा उल्लेख भारतीय संविधानात आहे. महादेव कोळी ही जमात अस्तित्वात नाही. महादेव हे स्थळ वाचक नाव आहे. कोळी जमातीची रुढी परंपरा या महादेव कोळी जमातीच्या रुढी परंपरा म्हणून जाहीर केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १९५० पूर्वीच्या सर्वांच्या मूळ नोंदी या कोळी आदिवासी कोळी आहेत. परंतु ही परिस्थिती शासनाला व राजकीय पक्षांना माहीत असून सुध्दा या प्रश्नाकडे गेली ३५ वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण कोळी जमातीवर अन्याय केला असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी रत्नागिरी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सदस्य रमण पावसे व रायगड आदिवासी कोळी समाज समन्वय समिती जनार्दन पाटील व नारायण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.रेवस-पाली पदयात्रा मंडळ रेवस गाव अध्यक्ष धर्मा कोळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गणेश कोळी, नवनाथ कोळी, अंबर नाखवा, हरेश्वर कोळी, रंजित पेढवी, बी.एन.कोळी, डी.के.कोळी, दत्ता कोळी, मोरेश्वर नाखवा, गजानन कोळी व मंडळाचे सर्व पदाधिकारी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने रेवस-बोडणी परिसरातील कोळी बांधवांनी हजारोंच्या संख्येत राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना रजिस्टर पोस्टाने निवेदने पाठविली आहेत त्याबद्दल महेंद्र चोगले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत.