शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

कोळी बांधवांना आश्वासने नको

By admin | Updated: July 11, 2017 03:42 IST

सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सर्वच राजकीय पक्ष निवडणूक आल्यानंतर कोळी बांधवांना फक्त आश्वासने देतात, हेच आजपर्यंत पाहत आलो आहोत. मात्र यापुढे हे चालू देणार नाही आणि म्हणून येत्या २७ जुलै २०१७ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे संविधानात हक्क असणाऱ्या सर्व आदिवासी जमाती एकत्रित येऊन शासनाला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी कोळी समाज संघटना कोकण विभाग प्रमुख महेंद्र चोगले यांनी केले आहे.अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील राममंदिराच्या पटांगणात रविवारी रेवस - बोडणी कोळी बांधवांच्या कार्यक्रमात चोगले बोलत होत. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते, आमचे केंद्रामध्ये सरकार आहे. महाराष्ट्रातील कोळी जमातीतील बांधवांनी आम्हाला निवडून दिल्यास पहिल्याच अधिवेशनात जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासने देऊन तीन वर्षे पूर्णे होऊ न सुध्दा आश्वासनाचा पूर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत. याचा उल्लेख भारतीय संविधानात आहे. महादेव कोळी ही जमात अस्तित्वात नाही. महादेव हे स्थळ वाचक नाव आहे. कोळी जमातीची रुढी परंपरा या महादेव कोळी जमातीच्या रुढी परंपरा म्हणून जाहीर केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १९५० पूर्वीच्या सर्वांच्या मूळ नोंदी या कोळी आदिवासी कोळी आहेत. परंतु ही परिस्थिती शासनाला व राजकीय पक्षांना माहीत असून सुध्दा या प्रश्नाकडे गेली ३५ वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण कोळी जमातीवर अन्याय केला असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी रत्नागिरी आदिवासी कोळी समाज समन्वय समिती सदस्य रमण पावसे व रायगड आदिवासी कोळी समाज समन्वय समिती जनार्दन पाटील व नारायण चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.रेवस-पाली पदयात्रा मंडळ रेवस गाव अध्यक्ष धर्मा कोळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी गणेश कोळी, नवनाथ कोळी, अंबर नाखवा, हरेश्वर कोळी, रंजित पेढवी, बी.एन.कोळी, डी.के.कोळी, दत्ता कोळी, मोरेश्वर नाखवा, गजानन कोळी व मंडळाचे सर्व पदाधिकारी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. जातीच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रेवस ते पाली पदयात्रा मंडळाच्या वतीने रेवस-बोडणी परिसरातील कोळी बांधवांनी हजारोंच्या संख्येत राज्याचे मुख्यमंत्री व राष्ट्रपतींना रजिस्टर पोस्टाने निवेदने पाठविली आहेत त्याबद्दल महेंद्र चोगले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.कोळी ही मुख्य आदिवासी जमात असून महादेव, मल्हार, टोकरे, ढोर आदी उपजमाती आहेत.