शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
4
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
5
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
6
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
7
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
8
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
9
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
10
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
11
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
12
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
13
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
14
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
15
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
16
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
17
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
18
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
19
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
20
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

कोल्हापूर जिल्हा परिषद देशात ठरली ‘लय भारी’; ३० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 00:52 IST

केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत येथील जिल्हा परिषद देशात ‘लय भारी’ ठरली आहे. ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळाल्यानंतर पाठोपाठ केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ), जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांना निमंत्रित केले आहे. सन २०१३-१४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. परिषदेची केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेच्या सरचिटणीस रश्मी सारस्वत, सहसंशोधक अंजू राय यांनी १३ आणि १४ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येऊन वेगवेगळ्या उपक्रमांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राच्या पंचायत राज विभागाकडे देण्यात आला. अशाच प्रकारचे देशभरातील अहवाल आल्यानंतर प्रत्येक राज्यातील एका जिल्हा परिषदेची निवड या सन्मानासाठी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून कोल्हापूरला मान मिळाला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेला बुधवारी ई-मेलद्वारे कळविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात पहिला क्रमांक आणि केंद्र स्तरावर दखल एकाच वर्षी घेणे हे कौतुकास्पद आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम करणारे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीआज होणार अनोखे स्वागत..राज्य आणि केंद्र पातळीवर जिल्हा परिषदेला पोहोचविण्यात मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी प्रवेशद्वाराजवळ जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन अनोखा सन्मान करण्यात येणार आहे.