शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
4
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
5
नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
6
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
7
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
8
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
9
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
10
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
12
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
13
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
14
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
15
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
16
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
17
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
18
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
19
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
20
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद देशात ठरली ‘लय भारी’; ३० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 00:52 IST

केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत येथील जिल्हा परिषद देशात ‘लय भारी’ ठरली आहे. ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळाल्यानंतर पाठोपाठ केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ), जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांना निमंत्रित केले आहे. सन २०१३-१४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. परिषदेची केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेच्या सरचिटणीस रश्मी सारस्वत, सहसंशोधक अंजू राय यांनी १३ आणि १४ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येऊन वेगवेगळ्या उपक्रमांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राच्या पंचायत राज विभागाकडे देण्यात आला. अशाच प्रकारचे देशभरातील अहवाल आल्यानंतर प्रत्येक राज्यातील एका जिल्हा परिषदेची निवड या सन्मानासाठी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून कोल्हापूरला मान मिळाला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेला बुधवारी ई-मेलद्वारे कळविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात पहिला क्रमांक आणि केंद्र स्तरावर दखल एकाच वर्षी घेणे हे कौतुकास्पद आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम करणारे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीआज होणार अनोखे स्वागत..राज्य आणि केंद्र पातळीवर जिल्हा परिषदेला पोहोचविण्यात मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी प्रवेशद्वाराजवळ जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन अनोखा सन्मान करण्यात येणार आहे.