शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोल्हापूर जिल्हा परिषद देशात ठरली ‘लय भारी’; ३० लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 00:52 IST

केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत येथील जिल्हा परिषद देशात ‘लय भारी’ ठरली आहे. ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळाल्यानंतर पाठोपाठ केंद्र स्तरावरही ३० लाखांचे बक्षीस परिषदेला मिळणार आहे. २४ एप्रिलला नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सन्मान होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ), जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांना निमंत्रित केले आहे. सन २०१३-१४ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. परिषदेची केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेच्या सरचिटणीस रश्मी सारस्वत, सहसंशोधक अंजू राय यांनी १३ आणि १४ मार्चला जिल्हा दौऱ्यावर येऊन वेगवेगळ्या उपक्रमांची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राच्या पंचायत राज विभागाकडे देण्यात आला. अशाच प्रकारचे देशभरातील अहवाल आल्यानंतर प्रत्येक राज्यातील एका जिल्हा परिषदेची निवड या सन्मानासाठी झाली आहे. त्यात महाराष्ट्रातून कोल्हापूरला मान मिळाला आहे. ही माहिती जिल्हा परिषदेला बुधवारी ई-मेलद्वारे कळविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात पहिला क्रमांक आणि केंद्र स्तरावर दखल एकाच वर्षी घेणे हे कौतुकास्पद आहे. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर काम करणारे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा हा सन्मान आहे. - अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीआज होणार अनोखे स्वागत..राज्य आणि केंद्र पातळीवर जिल्हा परिषदेला पोहोचविण्यात मुख्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे योगदान आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी प्रवेशद्वाराजवळ जिल्हा परिषदेच्या कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन अनोखा सन्मान करण्यात येणार आहे.