शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: February 25, 2016 16:14 IST

कोल्हापूर - वैभववाडी या रेल्वेमार्गाला मार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षापासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

२५ वर्षाची कोल्हापूरकरांची मागणी मान्य : पहिल्या टप्प्यासाठी १३७५ कोटींची तरतूद; कोल्हापूर-पुणे विद्युतीकरणास मान्यताकोल्हापूर : कोल्हापूर - वैभववाडी या रेल्वेमार्गाला मार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षापासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. शिवाय कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ६१ कोटी५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांच्या महत्वाच्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरु होण्यासाठी कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर-राजापूर, कोल्हापूर - वैभववाडी असे तीन मार्ग सुचविण्यात आले होते. त्यापैकी कमी अंतराचा आणि सोयीस्कर ठरणारा मार्ग म्हणून कोल्हापूर- वैभववाडी या मार्गाची निवड करण्यात आली. त्यानुसार या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण जानेवारीमध्ये पूर्ण झाले. शिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर करण्यात आला. त्यामुळे या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळेल अशी कोल्हापूरकरांना आशा होती.

सुमारे १०७ किलोमिटर अंतराच्या संबंधित रेल्वे मार्गासाठी एकूण ३०५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. पण, त्यापैकी १३७५ कोटी रूपयांची पहील्या टप्प्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याची घोषणा गुरुवारी अधिकृतरित्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला मोठया प्रमाणावर चालना मिळणार आहे. दरम्यान, गेल्या दहावर्षांपासून कोल्हापूर- पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाची मागणी प्रलंबीत होती. या मार्गाच्या विद्युतीकरणाला मान्यता देत त्यासाठी ६१कोटी ५० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली.असा असेल हा मार्गवैभववाडी - उपळे - सैतवडे - भूतलवाडी - कळे - भुये - कसबा बावडा - रेल्वे गुडस मार्केट यार्ड (कोल्हापूर) असा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरात जंक्शन उभारण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या सर्व्हेणचा आदेश दिला होता. त्यानुसार या मार्गाच्या सर्वेक्षणाला ५ मे २०१५ रोजी वैभववाडीतून सुरुवात झाली. मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. दोन पथकांद्वारे सर्व्हेणाचे काम पूर्ण केले आहे. मार्गाचा उपयोग असाकोल्हापूर हे कोेकण रेल्वेला जोडल्याने कोकण,कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूरमार्गे विशाखापट्टणम, कोलकाता, आदी पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला औद्योगिकदृट्या विशेष महत्व प्राप्त होण्यास चालना मिळणार आहे. तर मागास राहीलेला गगणबावडा तालुकासह कोकणाच्या विकासाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे.