शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: February 25, 2016 16:14 IST

कोल्हापूर - वैभववाडी या रेल्वेमार्गाला मार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षापासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

२५ वर्षाची कोल्हापूरकरांची मागणी मान्य : पहिल्या टप्प्यासाठी १३७५ कोटींची तरतूद; कोल्हापूर-पुणे विद्युतीकरणास मान्यताकोल्हापूर : कोल्हापूर - वैभववाडी या रेल्वेमार्गाला मार्गाला मान्यता मिळाल्याने गेल्या २५ वर्षापासूनचे कोल्हापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रूपयांची आर्थिक तरतूद केली आहे. शिवाय कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ६१ कोटी५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांच्या महत्वाच्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरु होण्यासाठी कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर-राजापूर, कोल्हापूर - वैभववाडी असे तीन मार्ग सुचविण्यात आले होते. त्यापैकी कमी अंतराचा आणि सोयीस्कर ठरणारा मार्ग म्हणून कोल्हापूर- वैभववाडी या मार्गाची निवड करण्यात आली. त्यानुसार या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण जानेवारीमध्ये पूर्ण झाले. शिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर करण्यात आला. त्यामुळे या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळेल अशी कोल्हापूरकरांना आशा होती.

सुमारे १०७ किलोमिटर अंतराच्या संबंधित रेल्वे मार्गासाठी एकूण ३०५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. पण, त्यापैकी १३७५ कोटी रूपयांची पहील्या टप्प्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याची घोषणा गुरुवारी अधिकृतरित्या अर्थसंकल्पात करण्यात आली. या मार्गामुळे कोल्हापूर आणि कोकणच्या विकासाला मोठया प्रमाणावर चालना मिळणार आहे. दरम्यान, गेल्या दहावर्षांपासून कोल्हापूर- पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणाची मागणी प्रलंबीत होती. या मार्गाच्या विद्युतीकरणाला मान्यता देत त्यासाठी ६१कोटी ५० लाखांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची आणखी एक मागणी रेल्वेमंत्र्यांनी मान्य केली.असा असेल हा मार्गवैभववाडी - उपळे - सैतवडे - भूतलवाडी - कळे - भुये - कसबा बावडा - रेल्वे गुडस मार्केट यार्ड (कोल्हापूर) असा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर मार्केट यार्ड परिसरात जंक्शन उभारण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाच्या सर्व्हेणचा आदेश दिला होता. त्यानुसार या मार्गाच्या सर्वेक्षणाला ५ मे २०१५ रोजी वैभववाडीतून सुरुवात झाली. मुंबईतील जे. पी. इंजिनिअरिंग कंपनीने सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. दोन पथकांद्वारे सर्व्हेणाचे काम पूर्ण केले आहे. मार्गाचा उपयोग असाकोल्हापूर हे कोेकण रेल्वेला जोडल्याने कोकण,कोल्हापूर, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूरमार्गे विशाखापट्टणम, कोलकाता, आदी पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरला औद्योगिकदृट्या विशेष महत्व प्राप्त होण्यास चालना मिळणार आहे. तर मागास राहीलेला गगणबावडा तालुकासह कोकणाच्या विकासाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे.