शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कोल्हापूर :  तरुणाईच्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवा : रघुनाथ माशेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:58 IST

भारतीयांनी केलेले सिस्टीमॅटिक इनोव्हेशन हे कमी खर्चात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या तरुणाईच्या टॅलेंट, टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, परंपरेच्या पगड्याची मानसिकता बदला, मी हे करू शकतो, भारत हे करीलच, असा आत्मविश्वास बाळगा... असा वडीलकीचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी दिला. येथील १२५ कोटी भारतीयांच्या चेहऱ्यांवर हास्य आणणारे संशोधन सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतरुणाईच्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवा : रघुनाथ माशेलकर‘शतकोत्तर अक्षरगप्पा’ कार्यक्रम

कोल्हापूर : भारतीयांनी केलेले सिस्टीमॅटिक इनोव्हेशन हे कमी खर्चात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. या तरुणाईच्या टॅलेंट, टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवा, परंपरेच्या पगड्याची मानसिकता बदला, मी हे करू शकतो, भारत हे करीलच, असा आत्मविश्वास बाळगा... असा वडीलकीचा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी दिला. येथील १२५ कोटी भारतीयांच्या चेहऱ्यांवर हास्य आणणारे संशोधन सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.शाहू स्मारक भवनात सह्याद्री प्रकाशन, अक्षर दालन, निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने ‘शतकोत्तर अक्षरगप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘अक्षर दालन’चे रवींद्र जोशी उपस्थित होते. डॉ. सागर देशपांडे लिखित ‘पुस्तकात न मावणारी माणसं’ या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन झाले.डॉ. माशेलकर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी आयुष्याच्या प्रयोगशाळेतून ज्ञानभांडार तयार केले आहे. हे पारंपरिक ज्ञान पुस्तकांत ४०० कोटी पानांत बंद न राहता सर्वांच्या कल्याणासाठी वापरले गेले पाहिजे. भारतीय आयुर्वेद, ज्ञान, येथील संशोधन यांची बायोपायरसी रोखली पाहिजे. त्यामुळे आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथीने न भांडता एकत्र येऊन देशासाठी काम केले पाहिजे.ते म्हणाले, आज जग वेगाने बदलतंय. या स्पर्धेत टिकायचे असेल तर सर्जनशीलतेला पर्याय नाही. आज तंत्रज्ञानाने मोठा विस्तार केला आहे. माणसाला रोबोसारखे पर्याय आले आहेत. अशा वेळी केवळ शिक्षणाचा हक्क यावर न थांबता योग्य शिक्षण आणि शिक्षणाचा योग्य मार्ग निवडला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी वेळेच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. डॉ. सागर देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

इंडोव्हेशन स्वस्त आणि मस्तभारतीय संशोधनाबद्दल माशेलकर म्हणाले, भारतीयांनी केलेल्या संशोधनाला मी इंडोव्हेशन म्हणतो. येथील संशोधन हे स्वस्त आणि मस्त आहे; कारण ते गरिबातल्या गरीब माणसालाही परवडणारं आणि तितकंच गुणवत्तापूर्णही आहे. हे इंडोव्हेशन संशोधन जगभरातील देशांकडून स्वीकारले जाते. आपण मंगळयान तयार केले; पण ‘मंगळ’ असलेली मुलगी स्वीकारत नाही. चंद्रावर पाणी शोधले; पण महिलांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागते. ही परिस्थिती बदलली पाहिजे. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर