शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिला ‘अर्जुन ’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:20 IST

कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचा ई-मेल बुधवारी (दि. १९) रोजी तिला प्राप्त झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच करवीरनगरीतील क्रीडारसिकांंकडून आनंदाची पुन्हा एकदा लाट पसरली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिला ‘अर्जुन ’ पुरस्कार जाहीरक्रीडानगरीत पुन्हा एकदा आनंदाची लाट

कोल्हापूर : कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. याबाबतचा ई-मेल बुधवारी (दि. १९) रोजी तिला प्राप्त झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच करवीरनगरीतील क्रीडारसिकांंकडून आनंदाची पुन्हा एकदा लाट पसरली आहे. यापुर्वीच मागील महिन्यात तिने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.

नेमबाजीमधील २५ मीटर पिस्तल प्रकारात राही ही एकमेव आघाडीची नेमबाजपटू आहे. तिने यापुर्वी २००८ साली युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तल प्रकारात प्रथम सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कामगिरी केली.

२०११ साली आशियाई स्पर्धेत तिने कास्य पदकाची कमाई करीत लंडन आॅलंम्पिकचे दारही आपल्यासाठी खोलले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महीला ठरली. यानंतर चॅगवॉन येथे आयएफएस विश्व नेमबाजी स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकाविले.

ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिनेही सुवर्ण पदक, तर इचीआॅनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कास्य पदक पटकाविले. २२ आॅगस्ट २०१८ साली जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर नेमबाजीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारी व महिलांमध्ये पहीली भारतीय ठरली.

तिच्या या कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी अर्जुन पुरस्कार समितीकडे मागील आठवड्यात शिफारस केली होती. त्यानूसार या समितीकडून बुधवारी (दि.१८) रोजी तिला हा पुरस्कार जाहीर झाल्याचा मेल आला. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचे क्रीडानगरीत समजताच आनंदाची लाट पसरली. 

 

कोल्हापूरची ‘राही’ पाचवी अर्जुनवीरयापुर्वी १९६३ साली हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना , तर १९७६ साली टेबलटेनिसपटू शैलजा साळोखे,२०११ साली सुवर्ण कन्या नेमबाज तेजस्विनी सावंत ,तर जलतरणात गोल्डन बॉय वीरधवल खाडे आणि आता २०१८ साली राही सरनोबत हिला या पुरस्काराने सन्मानीत केले जात आहे. यासह नेमबाजीमध्ये यापुर्वी २००० साली महाराष्ट्राच्या अंजली वेदपाठक-भागवत, २००४ साली- दिपाली देशपांडे, यांनाही अर्जुन पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्यामुळे राही नेमबाजीमधील चौथी अर्जुन पुरस्कार विजेती ठरली.

माझ्या या यशात माझी जर्मन प्रशिक्षक मुनिक बयान, राष्ट्रीय रायफल असोसिएशन,आॅलंम्पिक गोल्डक्वेस्ट, भारतीय क्रीडा प्राधिकरण(साई), महाराष्ट्र राज्य शासन,क्रीडा विभाग, फिजीकल ट्रेनर अक्षय,आहारतज्ज्ञ तांजिंदर आणि आई,वडील, काका,काकी सह माझे कुटूंब व मला पाठींबा देणाऱ्या करवीरनगरीच्या जनतेसह देशवासियांचे योगदान मोठे आहे.- राही सरनोबत, सुवर्ण कन्या आंतरराष्ट्रीय नेमबाज

राहीला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने माझ्या कुटूंबासह मला अत्यानंद होत आहे. याहीपेक्षा आणखी चांगली कामगिरी करुन तिने देशाचा झेंडा असाच डोलाने फडकावित ठेवावा. इतकीच अपेक्षा आहे.- जीवन सरनोबत, राहीचे वडील

कोल्हापूरच्या क्रीडानगरीत आतापर्यंतचे हे राहीच्या रुपाने पाचवा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ही श्रृंखला यापुढे या नगरीलीत क्रीडापटूंनी अशीच सुरु ठेवावी.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाअधिकारी, कोल्हापूर

 

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतkolhapurकोल्हापूर