शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

कोल्हापूर-सांगली तंबाखू अन् कॅन्सरचेही आगर

By admin | Updated: February 21, 2015 01:51 IST

सर्वाधिक उत्पादन : खाद्यात समावेश असल्याने बंदीत अडचणी, प्रबोधनाचाच प्रभावी ‘उतारा’

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -- राज्यातील एकूण तंबाखू उत्पादनापैकी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत निम्म्याहून अधिक उत्पादन होते. या दोन जिल्ह्यानजीकच्या कर्नाटकातील निपाणी परिसरातही तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने उत्पादनात तसेच तंबाखू खाण्याच्या व्यसनातही या परिसरातील लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे साहजिकच तोंडाच्या कॅन्सरचे या रुग्ण दोन जिल्ह्यातच अधिक असल्याचे कॅन्सरतज्ज्ञांचे मत आहे. माजी गृहराज्यमंत्री आर. आर. पाटील(आबा) यांचा तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राज्यात ‘तंबाखू बंदी’ची घोषणा केली आहे. बंदी झालीच तर अंमलबजावणीच्या पातळीवर उदासीनता असते. त्यामुळे शेवटी प्रभावी प्रबोधनातूनच तंबाखूवर उतारा शक्य आहे. पोषक हवामान आणि अन्य पिकांपेक्षा चार पैसे अधिक मिळत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि कर्नाटकातील निपाणी परिसरात अनेक वर्षांपासून शेतकरी तंबाखूचे पीक घेतात. कच्चा माल उपलब्ध होत असल्याने गुटखा, सुवासिक तंबाखू, बिडी तयार करण्याच्या उद्योगांची संख्या या परिसरात लक्षणीय आहे. परिणामी, खेड्या-पाड्यात तंबाखू खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरातील कामगार, चालक व अन्य कष्टाची कामे करणारे तंबाखूच्या आहारी जात आहेत. याशिवाय फॅड, फॅशन, अनुकरण म्हणून कॉलेजची मुलेही गुटखा, सुवासिक तंबाखू, मावा खात आहेत. कॉलेजजीवनात गुटख्याने सुरुवात केली. शिक्षण संपल्यानंतर तंबाखू चोळू लागला, अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला आहेत. बडा पगार असलेले व काही उच्चवर्गीय सिगारेटचा धूर काढत असतात. परिणामी तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट यांचा आरोग्यावर अतिशय घातक परिणाम जाणवत आहे.तंबाखू खाणाऱ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना तोंडाचा कॅन्सर होत असल्याचे पुढे आले आहे. तोंडाचा कॅन्सर झालेले सरासरी पन्नास टक्के रुग्ण वर्षाच्या आता दगावत आहेत, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. इतके गंभीर परिणाम होत आहेत. ‘आबां’च्या मृत्यूनंतर ‘तंबाखूबंदी’ची घोषणा करण्यापर्यंत शासनाने मजल मारली आहे. अजून त्यावर विधी विभागाचे मत घ्यावयाचे आहे. तंबाखूचा समावेश खाद्यपदार्थांमध्ये आहे. त्यामुळे सर्व अडथळे पार करीत बंदी घातली तरी अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही. गुटखा आणि सुवासिक तंबाखूवरील बंदीचे असेच झाले आहे.तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात जिल्ह्यात १९९६ पासून चळवळ राबवीत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन जागृती करीत आहोत. प्रत्येक वर्षी जागृतीची मोहीम व्यापकपणे राबविली जात आहे. केवळ बंदीने कोणतेही व्यसन सुटत नाही. मानसिक निर्धार आवश्यक आहे. जागृती, दुष्परिणामांची जाणीव करून दिल्यानंतर तंबाखूसारख्या व्यसनापासून दूर होणे शक्य आहे. - दीपक देवलापूरकर,अध्यक्ष, जनस्वास्थ्य संस्था आकडे बोलतातकृषी विभागाकडील आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात १५०० हेक्टर, तर सांगली जिल्ह्यात ४५० हेक्टर क्षेत्रात प्रतिवर्षी सरासरी तंबाखूचे पीक घेतले जाते. सुमारे २२०० टन तंबाखू उत्पादन होते. राज्यातील अन्य जिल्ह्यात १०० ते २०० हेक्टरच्या जवळपास तंबाखूची लागवड होते. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, आदी जिल्ह्यांत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे प्रत्येक महिन्याला कमीत कमी ३०० ते ४०० जणांना नव्याने तोंडाचा कॅन्सर होत आहे. लागण होण्यामध्ये ७० टक्के तरुण आहेत, ही बाब चिंताजनक आहे. - डॉ. सूरज पवार, कॅन्सरतज्ज्ञ