शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास

By admin | Updated: May 8, 2017 06:32 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने थेट मुंबई गाठले. ७०० किलोमीटरचा हा प्रवास सायकलने पूर्ण करत या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, शिवस्मारक, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आदींबाबत जनजागृती केली. २५ एप्रिलला हा प्रवास सुरू केला. संपतराव खाके हे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचे वय ३३ वर्षे आहे. प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा प्रवास करत असल्याची माहिती खाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोल्हापूर ते रायगड, त्यानंतर पाली आणि मुंबई गाठले. येत्या आठवडाभरात खाके स्वत: मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज मुक्ती, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळायला हवा मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख करा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, याकरिता कायद्यात बदल करण्यात यावा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाने ठोस कृती आराखडा आखावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे.