शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कोल्हापूर बनतंय ‘हॉटेलिंग हब’

By admin | Updated: May 7, 2017 04:35 IST

कोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक

इंदुमती गणेश/ लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुण्यानंतर मराठमोळ्या संस्कृतीचे शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जाते. अंबाबाई, जोतिबा या धार्मिक अधिष्ठानांसह ताराराणी, शाहू महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रुचकर जेवण अल्प दरात मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर हे ‘हॉटेलिंग हब’ म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख स्थान असलेल्या अंबाबाई मंदिरामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोल्हापूरला भाविकांचा आणि पर्यायाने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. वर्षाला किमान ४० लाख भाविक कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी येतात. कोल्हापूर शहरातील पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर पर्यटकांची पावले वळतात, ती पोटपूजेसाठी. पर्यटनासाठी आपण अन्य कोणत्याही शहरात गेलो की बऱ्याचवेळा जेवणाची आबाळ होत असते. कोल्हापूर मात्र याला अपवाद आहे. अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे तांबडा-पांढरा रस्सा, अस्सल खवय्यांचे आणि रुचकर जेवण मिळणारे शहर म्हणूनही कोल्हापूरची ख्याती आहे. केवळ अंबाबाई मंदिराच्या बाह्य आणि शहराच्या मध्यवर्ती परिसरात सातशे लहान-मोठी हॉटेल्स आहेत आणि त्यापेक्षा जास्त संख्येने घरगुती खानावळी आहेत. याशिवाय रंकाळा चौपाटी, केशवराव भोसले नाट्यगृहाजवळची खाऊगल्ली, राजारामपुरी अशा ठरावीक ठिकाणी जिभेचे चोचले पुरविणारे अनेक पदार्थ मिळतात. कोल्हापुरी नावाचे जगभरात ब्रँडिंग कोल्हापूरसह अन्य कोणत्याही शहरात जा. तेथील प्रत्येक हॉटेलमध्ये कोल्हापुरी नावाने चार-पाच डिशेस असतात. स्वतंत्र कोल्हापुरी खाद्यपदार्थांची यादी मेनूकार्डमध्ये असते. पनीर, काजू मसाला, कोफ्ता, रोटीसारख्या पंजाबी डिशेसना पर्यटकांकडून अधिक पसंती दिली जाते. वडापाव, मिसळ!जेवणाबरोबरच कोल्हापुरात नाष्ट्याचे पदार्थही तितकेच रुचकर बनवले जातात. वडापाव, झणझणीत मिसळ, कटवडा अशा अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. दहा ते पंधरा रुपयांत पोहे, उपमा, आप्पे, इडली यांसारखे पदार्थ भरपेट खाता येतात. खानावळींमध्ये वेटिंग : पंचतारांकित हॉटेल्ससह अनेक मोठ्या हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी असली तरी येथील पेठांमध्ये आणि गल्लीबोळांमध्ये असलेल्या खानावळींनी तांबड्या-पांढऱ्या रश्शासह जेवणाचे विविध प्रकार जगभर पोहोचविले आहेत. एकट्या मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या परिसरात सव्वाशेहून अधिक घरगुती खानावळी आहेत. खास या खानावळींमध्ये जेवण्यासाठी पुण्यासारख्या शहरातून लोक येतात. चुलीवरचे पिठले, भाकरी व मिरचीचा ठेचा आहेच. इथे आलेला पर्यटक कधीच जेवण चांगले नाही म्हणून अर्धपोटी जात नाही. त्यामुळेच देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेला पर्यटक खाद्यभ्रमंती करूनच येथून तृप्त मनाने बाहेर पडतो. त्यामुळे कोल्हापूरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्यात या खाद्यसंस्कृती आणि हॉटेलिंग हबच्या दृष्टीनेही पावले उचलावी लागणार आहेत. कोल्हापूरची खाद्यसंस्कृती पूर्वीपासूनच चांगली आहे. नाष्टा, जेवणाच्या पदार्थांचे असंख्य प्रकार, अल्प दर आणि वाढत्या पर्यटनामुळे ती जगभर पोहोचले आहेत. घरगुती खानावळींचाही मोलाचा वाटा आहे. शहरविकासाच्या दृष्टीने रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा परिसरात ‘फूड कोर्ट’सारखी संकल्पना राबविण्यात यावी. - उज्ज्वल नागेशकर (हॉटेल व्यवसायिक)