शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोकणच्या रेल्वे प्रवासाला राज्याचा खोडा?; रेल्वे अधिकाऱ्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:47 IST

राज्य सरकारकडून पत्र न देता तोंडी सूचना

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजून कोकणात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. यावरून राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात ढकलाढकली सुरू आहे. ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे राज्य सरकारने आम्हाला सांगितले असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर गाड्या सुरू करण्याची जबाबदारी रेल्वेची असून ही सेवा सुरू करण्यास आमचा विरोध नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, राज्य सरकारकडून ७ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेला विशेष गाड्या चालविण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डानेही ९ आॅगस्ट रोजी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला. ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र राज्य सरकारच्या अधिकाºयांनी अचानक हा निर्णय थांबवण्याच्या तोंडी सूचना दिल्या. लेखी अधिकृत पत्र देण्याची विनंती रेल्वे अधिकाºयांनी राज्य सरकारला केली. परंतु, तसे पत्र त्यांनी पाठविले नाही.आम्ही सज्ज!राज्य सरकारने गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यास सज्ज राहा, असे पत्र मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनाला पाठविले होते. परंतु रेल्वेने तयारी केल्यानंतरही राज्य सरकारकडून आम्हाला ‘रेल्वे सोडू नका, आदेशाची वाट पाहा,’ असे सांगण्यात आल्याने ही सेवा सुरू झालेली नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेशोत्सव