शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत कोकणच अग्रेसर

By admin | Updated: June 24, 2017 00:43 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होवू लागले आहे. राज्यात कोकण विभागाने या अभियानामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होवू लागले आहे. राज्यात कोकण विभागाने या अभियानामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पाचपैकी ३ जिल्हे व ४५ तालुक्यांपैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत. ९५ टक्के घरांमध्ये वैयक्तिक शौचालये असून, ९२ टक्के ग्रामपंचायतींनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये कोकण महसूल विभागामध्ये समावेश असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा देशात ८ वा व राज्यात पहिला क्रमांक आला. नवी मुंबईप्रमाणेच कोकण विभागामधील पाचही जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे अभियान यशस्वी करणे शक्य झाले आहे. या परिसरामध्ये तब्बल ४२ नगरपालिका व नगरपरिषदा असून त्यापैकी ३० पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित १२ परिषदांनीही यासाठीचे ठराव केले असून कार्यवाही सुरू केली आहे. नगरपरिषदांमध्ये २०,३८३ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १५,००६ चे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३२३९ शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ठाणे ९४, पालघर ७७, सिंधुदुर्ग ७१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून रायगडने सर्वात कमी ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत व पेण या पाच तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नसून ते जूनअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असते तर कोकण महसूल विभागातील सर्वच्या सर्व जिल्हे हागणदारीमुक्त होवून नवीन विक्रम झाला असता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे हे तीन जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. महसूल विभागामध्ये २९६८ ग्रामपंचायती असून त्यापैकी २७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. फक्त २३१ ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. २०१२ च्या सर्वेक्षणाप्रमाणे कोकण परिसरात १३ लाख ३१ हजार ५६१ कुटुंबे आहेत. यापैकी तब्बल ९५ टक्के म्हणजेच १२ लाख ६० हजार ९६२ कुटुंबांमध्ये वैयक्तिक शौचालये असून अजून ७० हजार ५९९ कुटुंबांनी शौचालये बांधलेली नसून ते बांधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये पूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून कोकण विभागामध्ये मात्र हे उद्दिष्ट आॅगस्ट २०१७ पर्यंतच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीमधील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याची माहिती कोकण महसूल आयुक्तालय कार्यालयातून देण्यात आली आहे. फक्त सात तालुक्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राज्यात सर्वात प्रभावीपणे स्वच्छ भारत अभियान कोकणामध्ये राबविण्यात आले आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ४५ पैकी ३८ तालुके व ९२ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत, पेण व पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले की पूर्ण कोकण परिसर हागणदारीमुक्त होणार असून त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रभावी अंमलबजावणी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागामध्ये सर्वात प्रभावीपणे हे अभियान राबविले जात आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहे. ९२ टक्के ग्रामपंचायतींनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले असून कोकण परिसरात स्वच्छतेची नवी चळवळ उभी राहिली आहे.अभियानामधील कोकणातील स्थितीराज्यामध्ये ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून त्यामध्ये कोकणातील पाचपैकी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील गुणानुक्रमानुसार पहिल्या १५ जिल्ह्यांमध्ये कोकण विभागातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील ४५ पैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत, पेण हे पाच तालुके जुलैपर्यंत हागणदारीमुक्त घोषित केले जातील.पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू आॅगस्ट अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करतील. कोकण विभागातील २९६८ पैकी २७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून फक्त २३१ शिल्लक आहेत. ३१ मे २०१७ पर्यंत १२,६०,९६२ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. पाच जिल्ह्यात फक्त ७०,५९९ कुटुंबांकडेच (५ टक्के) वैयक्तिक शौचालय नाही.