शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

स्वच्छतेत कोकणच अग्रेसर

By admin | Updated: June 24, 2017 00:43 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होवू लागले आहे. राज्यात कोकण विभागाने या अभियानामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

नामदेव मोरे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होवू लागले आहे. राज्यात कोकण विभागाने या अभियानामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. पाचपैकी ३ जिल्हे व ४५ तालुक्यांपैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत. ९५ टक्के घरांमध्ये वैयक्तिक शौचालये असून, ९२ टक्के ग्रामपंचायतींनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये कोकण महसूल विभागामध्ये समावेश असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा देशात ८ वा व राज्यात पहिला क्रमांक आला. नवी मुंबईप्रमाणेच कोकण विभागामधील पाचही जिल्ह्यांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे अभियान यशस्वी करणे शक्य झाले आहे. या परिसरामध्ये तब्बल ४२ नगरपालिका व नगरपरिषदा असून त्यापैकी ३० पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित १२ परिषदांनीही यासाठीचे ठराव केले असून कार्यवाही सुरू केली आहे. नगरपरिषदांमध्ये २०,३८३ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी १५,००६ चे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३२३९ शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ठाणे ९४, पालघर ७७, सिंधुदुर्ग ७१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून रायगडने सर्वात कमी ६० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत व पेण या पाच तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नसून ते जूनअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असते तर कोकण महसूल विभागातील सर्वच्या सर्व जिल्हे हागणदारीमुक्त होवून नवीन विक्रम झाला असता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे हे तीन जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. महसूल विभागामध्ये २९६८ ग्रामपंचायती असून त्यापैकी २७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. फक्त २३१ ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. २०१२ च्या सर्वेक्षणाप्रमाणे कोकण परिसरात १३ लाख ३१ हजार ५६१ कुटुंबे आहेत. यापैकी तब्बल ९५ टक्के म्हणजेच १२ लाख ६० हजार ९६२ कुटुंबांमध्ये वैयक्तिक शौचालये असून अजून ७० हजार ५९९ कुटुंबांनी शौचालये बांधलेली नसून ते बांधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये पूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून कोकण विभागामध्ये मात्र हे उद्दिष्ट आॅगस्ट २०१७ पर्यंतच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतीमधील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याची माहिती कोकण महसूल आयुक्तालय कार्यालयातून देण्यात आली आहे. फक्त सात तालुक्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राज्यात सर्वात प्रभावीपणे स्वच्छ भारत अभियान कोकणामध्ये राबविण्यात आले आहे. ४२ नगरपरिषदा व नगरपंचायतींपैकी ३० हागणदारीमुक्त झाल्या आहेत. ४५ पैकी ३८ तालुके व ९२ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत, पेण व पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले की पूर्ण कोकण परिसर हागणदारीमुक्त होणार असून त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रभावी अंमलबजावणी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागामध्ये सर्वात प्रभावीपणे हे अभियान राबविले जात आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांपैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्हे हागणदारीमुक्त घोषित झाले आहे. ९२ टक्के ग्रामपंचायतींनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले असून कोकण परिसरात स्वच्छतेची नवी चळवळ उभी राहिली आहे.अभियानामधील कोकणातील स्थितीराज्यामध्ये ११ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून त्यामध्ये कोकणातील पाचपैकी ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील गुणानुक्रमानुसार पहिल्या १५ जिल्ह्यांमध्ये कोकण विभागातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील ४५ पैकी ३८ तालुके हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड, अलिबाग, कर्जत, पेण हे पाच तालुके जुलैपर्यंत हागणदारीमुक्त घोषित केले जातील.पालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू आॅगस्ट अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करतील. कोकण विभागातील २९६८ पैकी २७३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून फक्त २३१ शिल्लक आहेत. ३१ मे २०१७ पर्यंत १२,६०,९६२ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. पाच जिल्ह्यात फक्त ७०,५९९ कुटुंबांकडेच (५ टक्के) वैयक्तिक शौचालय नाही.