शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

आॅलवेज स्ट्रगल; घेणार का दखल?

By admin | Updated: July 17, 2014 01:11 IST

दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस

नेमेची येतो पावसाळा अन् दुर्दशाही : समस्येवर कायम तोडगा नाहीनागपूर : दरवर्षी पावसाळा येतो, ठिकठिकाणी पाणी साचते, नाल्या तुंबतात, रस्त्यांना तलावाचे स्वरूप येते. पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प होते. खड्डे उघडे पडतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची एक दिवस चर्चा होते. पाणी ओसरले की स्थिती पुन्हा जैसे-थे. नागरी सुविधांसाठी महापालिकेकडे दरवर्षी कर भरणाऱ्या नागरिकांची या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका व्हावी याकडे कोणीच लक्ष देत नाही. शहरात अनेक अशी ठिकाणे आहेत की तेथे दरवर्षी पाणी साचते. जबाबदार यंत्रणा परस्परांकडे बोट दाखवितात. पावसाळा संपला की पुढच्या पावसाळ्यापर्यंत याबाबत कोणी अवाक्षरही काढत नाही. निवडणुका आल्या की कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा केल्या जातात. आंतरराष्ट्रीय शहराची स्वप्ने दाखविली जातात. प्रत्यक्षात होत काहीच नाही. वर्धामार्गाला जोडणाऱ्या वळण मार्गावर असणारा हा पूल दरवर्षी तेथे साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरतो. पूर्वी येथे अपघात व्हायचे आता पावसाच्या पाण्याची समस्या आहे. थोडा जास्त पाऊस झाला तरी गुडघाभर पाणी येथे साचते व त्यामुळे पुलाखालून जाणारी वाहतूकच ठप्प पडते. पूल खोलगट भागात असल्याने अपघाताचाही धोका संभवतो. शहरातील बाजारपेठेत असणारा हा जुना पूल आहे. जुन्या आणि नवीन नागपूरला हा पूल जोडतो. महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिनीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलाखाली बाराही महिने ओलावा असतो. पावसाळ्यात तर येथे तळे साचते. पुलाच्या आजूबाजूचा भाग खोलगट असल्याने हा परिसरच जलमय होतो. रेल्वे रुळावरून खाली येणारे तसेच इतर भागातून वाहत येणारे पाणी ही सर्वात मोठी समस्या आहे. नागनदीला खेटून असणाऱ्या या पुलाची अवस्था पावसाळ्यात वेगळी राहात नाही. विशेष म्हणजे खोलगट भाग असल्याने येथे पावसाळ्यात अपघात होण्याची स्थिती आहे. अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. नागनदीतील पाणी रस्त्यावर येते. याशिवाय उतार असल्याने इतर भागातील पाणी येथे गोळा होते. वाहने हाती घेऊन ढकलत नेण्यापलीकडे पावसाळ्यात येथे पर्याय उरत नाही.