शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सर्पमित्राचा ‘किस आॅफ डेथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 05:26 IST

कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते

नवी मुंबई : कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी त्याने शंभरहून अधिक सर्पांना जीवदान दिले आहे.सोमनाथ म्हात्रे असे सर्पमित्राचे नाव आहे. परिसरात सर्पमित्र म्हणून तो सर्वांना परिचित होता. लोकवस्तीच्या ठिकाणी विषारी अथवा बिनविषारी साप आल्याची माहिती मिळताच तो सापाच्या मदतीसाठी धाव घेत असे. तसेच त्या सापाला जिवंत पकडून रहिवासी ठिकाणांपासून लांब झाडीमध्ये सोडून त्यांना जीवदान देत असे. अशाप्रकारे त्याने शहराच्या विविध ठिकाणावरून पकडलेल्या शंभरहून अधिक सापांना जीवदान दिल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला राहत्या परिसरातील एका कारमध्ये साप असल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्याने घटनास्थळी जावून जिवंत सापाला पकडले होते. परंतु या सापाला लोकवस्तीपासून दूरवर सोडण्यासाठी तो गेला असता, त्याठिकाणी सोमनाथम्हात्रे याला त्या सापाने दंश केल्याचे समजते. त्याला मागील तीन दिवसांपासून खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र दंश करणारा साप कोब्रा असल्यामुळे त्याच्या दंशाने सोमनाथच्या शरीरात त्याचे विष पसरले होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे म्हात्रे कुटुंबीयांसह निकटवर्तीय व सर्पमित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)