शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:10 IST

सरकारच्या लेखी आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित

नाशिक: नाशिकमधून निघालेला किसान सभेचा लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तब्बल पाच तास ही चर्चा सुरू होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती महाजन यांनी दिली. यानंतर लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार जे. पी. गावित यांनी यांनी याबद्दलची अधिकृत घोषणा केली.आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिकहून लाँग मार्चला सुरुवात केली. हा मोर्चा 27 तारखेला मुंबईत धडकणार होता. मात्र गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीनं आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या मान्य असल्याचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं. वन हक्क जमिनीचे दावे लवकरात लवकर निकाली काढा, अशी मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी होती. त्यांना सरकारकडून 3 महिन्यात दावे निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. यानंतर किसान सभेनं मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा यशस्वी झाली. सातबारा कोरा, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदिवासी लाँग मार्च करत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत निघाले होते.