शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

‘केंशव, चलायचं ना!’

By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST

‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची.

यदु जोशी - मुंबई
‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची. आता ते शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. साहेबांच्या त्या आवाजासाठी केशवचे कान आसुसलेले राहतील ते कायमचे. कधीही परत न येण्याच्या मार्गावर मुंडेसाहेब निघून गेल़े़़  
कालर्पयत ते उत्साहाने वावरत होते. 26 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार हे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील त्यांच्या बंगल्यावर आनंदाचं वातावरण होतं. हारतुरे येत होते, यशाचा सुगंध दरवळत होता; पण त्यातही मुंडेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्या प्रमोदजींच्या आठवणीनं़़़ 
‘आज प्रमोदजी अन् माङया आईवडिलांची मला सर्वाधिक आठवण येते. प्रमोदजी नसते तर मी कुठं असतो?’ असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले अन् तेवढय़ात प्रमोदजींची कन्या पूनम तिथे आल्या. त्यांना प्रेमाने जवळ घेताना हा कणखर नेता अधिकच हळवा झाला़़़ केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीनं, भाजपाच्या दृष्टीनं एक चांगली घटना घडली. ती म्हणजे आपसातील गैरसमज दूर सारून दोन दिग्गज नेते नितीन गडकरी आणि मुंडे एकत्र येऊ पाहात होते. दोघांच्या दोन बैठकाही एका आठवडय़ात झाल्या. तासन्तास बोलणं झालं. दिल्लीनंतर मुंबईत सत्ता आलीच पाहिजे, यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाण्याचंही ठरलं होतं. पण मुंडेंच्या जाण्याने दोघांमधील संबंध हे दुरावा आणि मैत्रीच्या मध्येच कायमचे अडकून राहिले आहेत. 
 
भाजपाचा एक कार्यकर्ता, नेता, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, केंद्रात मंत्री यापैकी कुठली भूमिका तुम्हाला स्वत:ला भावली, असं मुलाखतीच्या ओघात विचारलं तर म्हणाले, संघर्ष करणारा कार्यकर्ता हीच माझी जीवनभर ओळख राहावी, ही इच्छा आहे. समाजातील अनेक घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणा:या या नेत्याला जीवन अन् मृत्यू यांच्यात संघर्ष करण्यासाठी एक क्षणही नियतीनं दिला नाही.
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे निकटवर्ती अन् लाडके. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण, असा वाद आठ-दहा दिवसांपासून झडतोय. त्यात ‘वर नरेंद्र अन् खाली देवेंद्र’ असा नारा दिला गेला. तेव्हा मुंडेंच्या मार्गात आपण अडथळा ठरतोय की काय, या कल्पनेनं अस्वस्थ झालेले फडणवीस त्यांच्या निकटवर्तीयांनी अनुभवले. 
 
गैरसमजांचे मळभ लगेच दूर करण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली, ‘मुंडे साहेबांना आम्ही केंद्राकडे तीन महिन्यांसाठी उधार दिलं आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतून नेतृत्व करतील.’ मुंडे यांच्या अकाली जाण्याने आता ही उधारी कधीच फेडता येणार नाही़़़
 
भाजपा रुजवला
निवडक पत्रकारांशी गप्पा मारताना मुंडे एकदा सांगत होते, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा वाढविण्याची धडपड मी सुरू केली. मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या या भागात धनगर आदी जाती जोडू लागलो. पूर्वी मला पुण्याहून कोल्हापूरला कारने जायला चार-साडेचार तास लागायचे; कारण वाटेत कोणी स्वागताला नसायचं. भाजपाचा दूरदूर पत्ता नव्हता. याच मार्गानं जायला मला पुढे नऊ-दहा तास लागत, तेव्हा पक्ष रुजल्याचं समाधान मला मिळालं. एखादा लोकनेता रात्रीतून तयार होत नाही, त्यासाठी काही दशकं लागतात. त्यामुळेच मुंडेंचं अकाली निघून जाणं कार्यकत्र्याना पोरकं करून गेलं. 
 
आज का उशीर 
झाला नाही ?
कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा पोहोचणं यासाठी मुंडे यांची ख्याती होती. गमतीनं असं म्हणतात की, एकदा ते एका कार्यक्रमाला चक्क एक तास आधी पोहोचले. चौकशी केली असता कळलं की तो आदल्या दिवशीचा कार्यक्रम होता. 
आज राहून राहून वाटतंय, अपघाताच्या त्या जागी, त्याच वेळी मुंडे बरोबर का पोहोचले; तिथेही जरासा एखादा मिनिटाचा उशीर केला असता तर! पण नियतीला ते मान्य नव्हतं. अखेर तिनं डाव साधला.