शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘केंशव, चलायचं ना!’

By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST

‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची.

यदु जोशी - मुंबई
‘केंशव, अरे चलायचं ना!’ मुंडे मुंबईत असले की त्यांची आपल्या लाडक्या केशवसाठीची (स्वीय साहाय्यक केशव उपाध्ये) ही सानुनासिक हाक ठरलेली असायची. आता ते शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाहीत. साहेबांच्या त्या आवाजासाठी केशवचे कान आसुसलेले राहतील ते कायमचे. कधीही परत न येण्याच्या मार्गावर मुंडेसाहेब निघून गेल़े़़  
कालर्पयत ते उत्साहाने वावरत होते. 26 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार हे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतील त्यांच्या बंगल्यावर आनंदाचं वातावरण होतं. हारतुरे येत होते, यशाचा सुगंध दरवळत होता; पण त्यातही मुंडेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या त्या प्रमोदजींच्या आठवणीनं़़़ 
‘आज प्रमोदजी अन् माङया आईवडिलांची मला सर्वाधिक आठवण येते. प्रमोदजी नसते तर मी कुठं असतो?’ असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले अन् तेवढय़ात प्रमोदजींची कन्या पूनम तिथे आल्या. त्यांना प्रेमाने जवळ घेताना हा कणखर नेता अधिकच हळवा झाला़़़ केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीनं, भाजपाच्या दृष्टीनं एक चांगली घटना घडली. ती म्हणजे आपसातील गैरसमज दूर सारून दोन दिग्गज नेते नितीन गडकरी आणि मुंडे एकत्र येऊ पाहात होते. दोघांच्या दोन बैठकाही एका आठवडय़ात झाल्या. तासन्तास बोलणं झालं. दिल्लीनंतर मुंबईत सत्ता आलीच पाहिजे, यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला एकदिलाने सामोरे जाण्याचंही ठरलं होतं. पण मुंडेंच्या जाण्याने दोघांमधील संबंध हे दुरावा आणि मैत्रीच्या मध्येच कायमचे अडकून राहिले आहेत. 
 
भाजपाचा एक कार्यकर्ता, नेता, आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, केंद्रात मंत्री यापैकी कुठली भूमिका तुम्हाला स्वत:ला भावली, असं मुलाखतीच्या ओघात विचारलं तर म्हणाले, संघर्ष करणारा कार्यकर्ता हीच माझी जीवनभर ओळख राहावी, ही इच्छा आहे. समाजातील अनेक घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष करणा:या या नेत्याला जीवन अन् मृत्यू यांच्यात संघर्ष करण्यासाठी एक क्षणही नियतीनं दिला नाही.
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे निकटवर्ती अन् लाडके. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण, असा वाद आठ-दहा दिवसांपासून झडतोय. त्यात ‘वर नरेंद्र अन् खाली देवेंद्र’ असा नारा दिला गेला. तेव्हा मुंडेंच्या मार्गात आपण अडथळा ठरतोय की काय, या कल्पनेनं अस्वस्थ झालेले फडणवीस त्यांच्या निकटवर्तीयांनी अनुभवले. 
 
गैरसमजांचे मळभ लगेच दूर करण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली, ‘मुंडे साहेबांना आम्ही केंद्राकडे तीन महिन्यांसाठी उधार दिलं आहे. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतून नेतृत्व करतील.’ मुंडे यांच्या अकाली जाण्याने आता ही उधारी कधीच फेडता येणार नाही़़़
 
भाजपा रुजवला
निवडक पत्रकारांशी गप्पा मारताना मुंडे एकदा सांगत होते, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा वाढविण्याची धडपड मी सुरू केली. मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या या भागात धनगर आदी जाती जोडू लागलो. पूर्वी मला पुण्याहून कोल्हापूरला कारने जायला चार-साडेचार तास लागायचे; कारण वाटेत कोणी स्वागताला नसायचं. भाजपाचा दूरदूर पत्ता नव्हता. याच मार्गानं जायला मला पुढे नऊ-दहा तास लागत, तेव्हा पक्ष रुजल्याचं समाधान मला मिळालं. एखादा लोकनेता रात्रीतून तयार होत नाही, त्यासाठी काही दशकं लागतात. त्यामुळेच मुंडेंचं अकाली निघून जाणं कार्यकत्र्याना पोरकं करून गेलं. 
 
आज का उशीर 
झाला नाही ?
कुठल्याही कार्यक्रमाला उशिरा पोहोचणं यासाठी मुंडे यांची ख्याती होती. गमतीनं असं म्हणतात की, एकदा ते एका कार्यक्रमाला चक्क एक तास आधी पोहोचले. चौकशी केली असता कळलं की तो आदल्या दिवशीचा कार्यक्रम होता. 
आज राहून राहून वाटतंय, अपघाताच्या त्या जागी, त्याच वेळी मुंडे बरोबर का पोहोचले; तिथेही जरासा एखादा मिनिटाचा उशीर केला असता तर! पण नियतीला ते मान्य नव्हतं. अखेर तिनं डाव साधला.