शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...

By राजकुमार जोंधळे | Updated: September 29, 2024 20:10 IST

Killari Earthquake: ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

- राजकुमार जाेंधळेलातूर -  ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षाच्या काळात मराठवाड्यातील काही गावात भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना साैम्य धक्के जाणवले. गत ३१ वर्षात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगेाली जिल्ह्याला १२५ धक्के बसले आहेत. सप्टेंबर महिना उजाडला की महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या हाेतात.

१९९९ मध्ये बसले किल्लारीला ११ धक्के...सप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लाेहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले. १३ सप्टेंबर २०२८ राेजी ३.९ रिश्टर स्केलचा धक्का, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.९ आणि २.७ रिश्टर स्केलचे धक्के बसले. तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैन्य धक्के जाणवले.

२०२४ मध्ये एकही धक्का नाही...लातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्के बसले. याची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत हाेती. २०२३ कमी धक्के जाणवले. ऑक्टाेबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले. याची तीव्रता १.६ ते २़८ रिश्टर स्केल हाेती. २०२४ मध्ये भूकंपाची एकही नाेंद झाली नाही.

लातूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भूकंपमापन केंद्र...किल्लारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यात भूकंपमापन केंद्राची स्थापना केली. लातूर, औराद शहाजानी आणि आशिव (ता. औसा) येथे भूकंप मापन केंद्र असून, या केंद्रावर धक्क्यांची नाेंद हाेते.

लातूर-धाराशिवला सर्वाधिक बसले धक्के...३० सप्टेंबर १९९३ ते २०२३ या काळात लातूर-धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक ७३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० आणि २०११ मध्ये १० धक्के, २०१२ ते २०२३ मध्ये ३६ धक्क्यांची नाेंद झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास