शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...

By राजकुमार जोंधळे | Updated: September 29, 2024 20:10 IST

Killari Earthquake: ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

- राजकुमार जाेंधळेलातूर -  ३० सप्टेंबर २०२४ राेजी किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ३१ वर्ष पूर्ण हाेत आहेत. मात्र, आजही ‘किल्लारी’च्या आठवणी जाग्या आहेत. दरवर्षी गणेशाेत्सव काळात याची प्रकर्षाने जाणिव हाेते. गत ३१ वर्षात मराठवाड्यासह परिसराला तब्बल १२५ भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरवर्षी किल्लारीत ‘ब्लॅक-डे’ म्हणून पाळला जाताे.

सन २०१८ ते २०२४ या सहा वर्षाच्या काळात मराठवाड्यातील काही गावात भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाण वाढले आहे. काही गावांना साैम्य धक्के जाणवले. गत ३१ वर्षात मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगेाली जिल्ह्याला १२५ धक्के बसले आहेत. सप्टेंबर महिना उजाडला की महाप्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या हाेतात.

१९९९ मध्ये बसले किल्लारीला ११ धक्के...सप्टेंबर १९९३ ते सप्टेंबर २०२४ या काळात लातूर परिसराला भूकंपाचे ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये किल्लारीला ११ धक्के जाणवले. लातूर, धाराशिव, किल्लारी, लाेहारा, उमगरा, सास्तूर-माकणीला सर्वाधिक धक्के बसले. १३ सप्टेंबर २०२८ राेजी ३.९ रिश्टर स्केलचा धक्का, २१ डिसेंबर २०२१ राेजी ३.९ आणि २.७ रिश्टर स्केलचे धक्के बसले. तर ७ ते २३ सप्टेंबर २०२२ मध्ये तीन साैन्य धक्के जाणवले.

२०२४ मध्ये एकही धक्का नाही...लातूर जिल्ह्याला २०२२ मध्ये भूकंपाचे ११ धक्के बसले. याची तीव्रता १.४ पासून ३.१ रिश्टर स्केलपर्यंत हाेती. २०२३ कमी धक्के जाणवले. ऑक्टाेबर २०२३ मध्ये भूकंपाचे चार धक्के बसले. याची तीव्रता १.६ ते २़८ रिश्टर स्केल हाेती. २०२४ मध्ये भूकंपाची एकही नाेंद झाली नाही.

लातूर जिल्ह्यात तीन ठिकाणी भूकंपमापन केंद्र...किल्लारी भूकंपानंतर लातूर जिल्ह्यात भूकंपमापन केंद्राची स्थापना केली. लातूर, औराद शहाजानी आणि आशिव (ता. औसा) येथे भूकंप मापन केंद्र असून, या केंद्रावर धक्क्यांची नाेंद हाेते.

लातूर-धाराशिवला सर्वाधिक बसले धक्के...३० सप्टेंबर १९९३ ते २०२३ या काळात लातूर-धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक ७३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० आणि २०११ मध्ये १० धक्के, २०१२ ते २०२३ मध्ये ३६ धक्क्यांची नाेंद झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्रhistoryइतिहास