शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

मरेला मार

By admin | Updated: January 3, 2015 01:58 IST

नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली.

मुंबई / ठाणे : नेमेचि तुटणाऱ्या पेंटोग्राफमुळे मरे प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी तब्बल पाच तास रोखून ठेवली. रेल्वे पोलिसांचा लाठीचार्ज आणि प्रवाशांची दगडफेक या साऱ्या गदारोळात रेल्वेच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले. त्रास सहन करून थकलेल्या प्रवाशांनी मरेला चांगलाच मार दिला. शेकडो महिला प्रवाशांच्या किंकाळ्या!दिवा रेल्वे स्थानकात शुक्रवारी घडलेल्या दगडफेकीत जो तो स्वत:ला वाचवण्यासाठी धावपळ करत होता. त्यातच महिला प्रवासी तर प्रत्येक दगड पडल्याच्या आवाजानंतर जणू काही आपल्याच दिशेने दगड भिरकावण्यात आला असून, तो आपल्यावर पडेल, या भीतीपोटी किंकाळत होत्या. त्यामुळेही स्थानकात महिलांच्या ओरडण्यासह वाचवा, वाचवाचा टाहो होता. प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. आदेश भगत यांनी ही स्थिती सांगितली.लाखोंना लेटमार्कसह दांड्या : या घटनेमुळे लाखो चाकरमान्यांना लेटमार्कला सामोरे जावे लागले, तर अनेकांनी मध्येच अडकून पडल्यामुळे ट्रॅकमधून पदयात्रा करीत घराकडे मार्गक्रमण केले. त्यामुळे त्यांची कामाच्या ठिकाणी दांडीच झाली.१मध्य रेल्वेवरील गोंधळाबाबत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री व नेत्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. मात्र, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सरबराईत गुंतलेल्या या नेत्यांनी चर्चा तरी कधी केली आणि त्यातून काय साधले हे गुुलदस्त्यातच आहे.२मध्य रेल्वे खोळंबल्याने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे वृत्त सकाळी झळकू लागले. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना घटनास्थळी धाडल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. शिवाय भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. ३ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांनीही रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंशी थेट चर्चा केल्याचे म्हटले. तर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचा दावा केला. शिवाय उपनगर जिल्हाधिकारी, बेस्ट महाव्यवस्थापक, ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांशी चर्चा करून प्रवाशांसाठी तातडीने जादा बसेस सोडण्याच्या सूचना दिल्याचे तावडे म्हणाले.प्रवाशांचा ट्रान्स हार्बरमार्गे प्रवासमध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा परिणाम ट्रान्स हार्बर मार्गावरही जाणवला. दरम्यान मोटरमनने काही काळ आंदोलन केल्यामुळे ट्रान्स हार्बर सेवा ठप्प झाली, मात्र आंदोलन मागे घेताच सीएसटीला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ट्रान्स हार्बर मार्गाची निवड केली. प्रवाशांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे तीन ते चार तासांनंतरही सुरू न झाल्याने अनेक प्रवासी राज्य परिवहन, पालिका परिवहनच्या बस किंवा खाजगी वाहनांनी ठाणे ऐरोलीत दाखल झाले.नाशिककरही अडकलेमुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या गोंधळामुळे राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस या कल्याण स्थानकाच्या आसपास अडकल्या. त्यामुळे नाशिककरांनी शुक्रवारी सुट्टी मारत कल्याणहून परतीचा मार्ग स्वीकारला. गोंधळामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे ५-६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक कधी पूर्ववत होईल याची माहिती उपलब्ध होत नसल्याने बहुसंख्य प्रवासी रस्त्याच्या मार्गाने माघारी परतले.पाच तास हालसीएसटी-कल्याणला डाऊन लोकल दु. १२.१६ला तर कल्याण-सीएसटी अप लोकल दुपारी १२.४०च्या सुमारास रवाना झाली, त्यानंतर हळूहळू दु. १२.४०ला अप जलद, त्यापाठोपाठ दु. १.१८ला डाऊन जलदची वाहतूक सुरू झाली. मात्र संध्याकाळपर्यंत वाहतूक मंदगतीने सुरू होती. हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरू होती, तर ट्रान्स हार्बरची वाहतूक १० मिनिटे विलंबाने सुरू होती.टपावरून प्रवासया घटनेमुळे अनेकांनी डोंबिवलीत येत वाशीमार्गे ठिकठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कल्याणला पायी जाण्यापेक्षा डोंबिवलीत येऊन प्रवास करणे पसंत केले. यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. या गोंधळामुळे बसही ओव्हरलोड झाल्या होत्या. काहींनी बसमध्ये शिरण्यास जागा नसल्याने टपावर बसून प्रवास केला.टॅक्सीचालकांची चंगळमध्य रेल्वेच्या मार्गावरील गोंधळाचा फटका चाकरमान्यांना बसला असला, तरी ठाणे ते मुंबई आणि मुंबई ते ठाणेदरम्यानच्या टॅक्सीचालकांनी या धावपळीचा चांगलाच फायदा उठवला. दादर ते मुलुंडचे टॅरिफ साधारणपणे २८० रुपये होते, तर वरळी ते ठाण्याचे टॅरिफ ३७० रुपयांपर्यंत जाते़ मात्र आज दादर ते मुलुंड सरसकट ५०० रुपये तर वरळी ते ठाणे ८०० रुपये आकारले. चाकरमान्यांना ही लूट निमूटपणे सहन करावी लागली. तर या प्रकारामुळे रिक्षावाहतुकीची चंगळ होती. अनपेक्षितपणे भाडे मिळाल्याने रिक्षाचालक १० ते २० रुपयांच्या ठिकाणी तब्बल १०० ते २०० रुपये भाडे आकारत होते.घटनाक्रम06:50 कल्याण - ठाकुर्ली अप स्लोवर लोकलचा पेंटाग्राफ अडकला.07:26 पर्यंत ‘मरे’ने घेतला तत्काळ पॉवर ब्लॉक.08:25 डाऊन/अपची जलद वाहतूक सुरू.09:05 बदलापूरसह कल्याण या लोकल कारशेडला रवाना. तरीही अप धीम्या मार्गावर वाहतूक सुरू नाही.10:40 दिवा स्थानकात प्रवाशांचा उद्रेक, दगडफेकीसह तोडफोड, लोकल वाहतूक ठप्प.12:00 मोटरमनचे आंदोलन, सुरक्षाकवचाची मागणी.12:16 वाहतूक सुरू, डाऊन धीम्या मार्गावरून लोकल धावली.12:40 अप धीमा-जलद मार्ग सुरू.01:18 डाऊन जलदची वाहतूक सुरू.बेस्ट, केडीएमटी, एसटी सरसावलीमध्य व हार्बर रेल्वे ठप्प झाल्यामुळे फलाटांवर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी बेस्ट धाऊन आली़ मुंबईतील नऊ बसमार्गांवर दुपारी १२़३०नंतर १९ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या़ महत्त्वाची बस स्थानके, बस थांबे व गर्दीच्या ठिकाणी या बससेवा धावत होत्या़ मध्य रेल्वे रुळावर आली तरी सेवा सुरळीत होईपर्यंत बेस्ट सेवा सुरू राहिली़ मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर आणि अंधेरी बस आगारांतून या गाड्या सोडण्यात येत होत्या़ केडीएमसीनेही ठाणे, पनवेल, बदलापूर मार्गावर खास बस सोडल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली. सकाळी ९च्या सुमारास थेट मुंबईसाठी २ बसेस, ठाण्यासाठी ४ कल्याण-डोंबिवली येथून सोडण्यात आल्या. एसटीच्या कल्याण आगारातूनही ठाणे, मुंबईसाठी खास बसेसची सोय करण्यात आली.