शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

हिंगोली जिल्ह्यात दोन मुलांसह महिलेचे अपहरण, कळमनुरी तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 05:51 IST

तालुक्यातील सोडेगाव येथील महिलेचे दोन मुलांसह अपहरण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील सोडेगाव येथील महिलेचे दोन मुलांसह अपहरण झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.सुरेखा गंगाराम कुरूडे (३५) असे महिलेचे नाव आहे. ती माहेरी सोडेगाव येथे आली होती. सोमवारी ती आपल्या गणेश (७) व जयश्री (५) दोन मुलांसह नांदापूर येथून रेल्वेने सासरी सिरळीकडे जाण्यास निघाली होती. पोटात दुखत असल्याने ती चोंढी आंबा येथे उतरली. शिरडशहापूरकडे जायचे असल्याने रस्त्याच्या कडेला थांबली असताना अचानक तेथे एक कार उभी राहिली. दोन्ही मुलांना कारमध्ये घेतले. कार शिरडकडे जाणार असल्याचे सांगितल्याने महिलाही कारमध्ये बसली. प्रवासादरम्यान फोन घरी लावत असताना तिचा मोबाईल हिसकावून घेतला. नंतर फोन बंद केला. गुरूवारी भाऊ बालू बेले यांच्या फोनवर महिलेचा फोन आला. तिने घडलेला प्रकार आपल्या भावाला सांगितले. मला सध्या अहमदनगर जिल्ह्यात नारायणगावजवळ आंदरुण गावातील शेतात ठेवलेले आहे. बाजूलाच कार असल्याचेही ती फोनवर सांगत होती. नंतर हा फोन बंद येत होता. याप्रकरणी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या महिलेच्या शोधासाठी पथके तयार केली असून ती सांगितलेल्या ठिकाणी रवाना केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Hingoliहिंगोली