शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

संपापासून शेतकरी दूरच!खरिपाच्या तयारीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:51 IST

किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे.

मुंबई : किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे. राज्यातील शेतकरी नेत्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू असलेल्या शेतकऱ्याला फटका बसू नये म्हणून संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे केवळ डाव्या पक्षांपुरते मर्यादित राहिले आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवर फारसा परिणाम झालेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुक्रवारी व शनिवारी नेहमीप्रमाणे आवक झाली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा माल मोठ्या प्रमाणात आला होता. मुंबईत भाजीपाल्याची कोणतीही टंचाई नाही. खरीप हंगामाची तयारी व शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होते. त्यामुळे साहजिकच या महिन्यात शेतकºयाला पैशांची गरज असते. खर्चाची पूर्तता करण्यासाठी शेतकरी कृषीमालाची विक्री करतो. त्यातच भाजीपाला व टोमॅटो हे नाशवंत माल असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात त्याची विक्री करताना दिसत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचीही विक्री सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी खबरदारी म्हणून काही दूध संघांनी संकलन केले नव्हते. मात्र पहिल्या दिवशी आंदोलनाची धग न दिसल्याने शनिवारी दूध संघांनी संकलन केले.शनिवारी राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला, त्यामुळेआता खरिपाच्या कामाला आणखी वेग येणार आहे. या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यास त्यात शेतकरी संपाचे आंदोलन वाहून जाण्याची भीती आहे. शेतकरी संपासारख्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाआहे. शेतमालाची नासाडीकरून बळीराजाचेच नुकसान होते, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी घेतली आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही शेतकºयांना वेठीला धरून आंदोलन करण्यास विरोध दर्शविला आहे.७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूधपुरवठा थांबवणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी सांगितले. तर १० जूनला भारत बंद करण्याचा इशारा समितीने दिला आहे. मात्र त्याचा किती प्रभाव पडेल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप