शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

संपापासून शेतकरी दूरच!खरिपाच्या तयारीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:51 IST

किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे.

मुंबई : किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे. राज्यातील शेतकरी नेत्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू असलेल्या शेतकऱ्याला फटका बसू नये म्हणून संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे केवळ डाव्या पक्षांपुरते मर्यादित राहिले आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवर फारसा परिणाम झालेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुक्रवारी व शनिवारी नेहमीप्रमाणे आवक झाली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा माल मोठ्या प्रमाणात आला होता. मुंबईत भाजीपाल्याची कोणतीही टंचाई नाही. खरीप हंगामाची तयारी व शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होते. त्यामुळे साहजिकच या महिन्यात शेतकºयाला पैशांची गरज असते. खर्चाची पूर्तता करण्यासाठी शेतकरी कृषीमालाची विक्री करतो. त्यातच भाजीपाला व टोमॅटो हे नाशवंत माल असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात त्याची विक्री करताना दिसत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचीही विक्री सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी खबरदारी म्हणून काही दूध संघांनी संकलन केले नव्हते. मात्र पहिल्या दिवशी आंदोलनाची धग न दिसल्याने शनिवारी दूध संघांनी संकलन केले.शनिवारी राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला, त्यामुळेआता खरिपाच्या कामाला आणखी वेग येणार आहे. या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यास त्यात शेतकरी संपाचे आंदोलन वाहून जाण्याची भीती आहे. शेतकरी संपासारख्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाआहे. शेतमालाची नासाडीकरून बळीराजाचेच नुकसान होते, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी घेतली आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही शेतकºयांना वेठीला धरून आंदोलन करण्यास विरोध दर्शविला आहे.७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूधपुरवठा थांबवणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी सांगितले. तर १० जूनला भारत बंद करण्याचा इशारा समितीने दिला आहे. मात्र त्याचा किती प्रभाव पडेल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप