शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

संपापासून शेतकरी दूरच!खरिपाच्या तयारीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 02:51 IST

किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे.

मुंबई : किसान महासंघातर्फे पुकारलेल्या देशव्यापी शेतकरी संपाचा राज्यात फारसा प्रभाव जाणवत नसून संपापासून शेतकरी दूरच असल्याची स्थिती आहे. राज्यातील शेतकरी नेत्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू असलेल्या शेतकऱ्याला फटका बसू नये म्हणून संपात सहभागी न होण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे केवळ डाव्या पक्षांपुरते मर्यादित राहिले आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेवर फारसा परिणाम झालेला नाही. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही शुक्रवारी व शनिवारी नेहमीप्रमाणे आवक झाली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचा माल मोठ्या प्रमाणात आला होता. मुंबईत भाजीपाल्याची कोणतीही टंचाई नाही. खरीप हंगामाची तयारी व शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होते. त्यामुळे साहजिकच या महिन्यात शेतकºयाला पैशांची गरज असते. खर्चाची पूर्तता करण्यासाठी शेतकरी कृषीमालाची विक्री करतो. त्यातच भाजीपाला व टोमॅटो हे नाशवंत माल असल्याने शेतकरी मिळेल त्या भावात त्याची विक्री करताना दिसत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचीही विक्री सुरू आहे. शुक्रवारी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी खबरदारी म्हणून काही दूध संघांनी संकलन केले नव्हते. मात्र पहिल्या दिवशी आंदोलनाची धग न दिसल्याने शनिवारी दूध संघांनी संकलन केले.शनिवारी राज्यातील बहुतांश भागात पाऊस झाला, त्यामुळेआता खरिपाच्या कामाला आणखी वेग येणार आहे. या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यास त्यात शेतकरी संपाचे आंदोलन वाहून जाण्याची भीती आहे. शेतकरी संपासारख्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाआहे. शेतमालाची नासाडीकरून बळीराजाचेच नुकसान होते, अशी भूमिका खा. राजू शेट्टी यांनी घेतली आहे. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही शेतकºयांना वेठीला धरून आंदोलन करण्यास विरोध दर्शविला आहे.७ जूनपासून शहरांचा भाजीपाला व दूधपुरवठा थांबवणार असल्याचे किसान संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांनी सांगितले. तर १० जूनला भारत बंद करण्याचा इशारा समितीने दिला आहे. मात्र त्याचा किती प्रभाव पडेल, याबाबत शंका आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप