शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

पाणीबचतीसाठी सरसावली खाकी वर्दी

By admin | Updated: July 10, 2016 02:47 IST

अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण

- संजय तिपाले, बीड

अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षलागवड मोहिमेसोबतच आता जलपुनर्भरणाची कामे तेथे युद्धपातळीवर सुरु आहेत.सर्व तालुक्यांचे ठिकाण व ग्रामीण भागात असलेल्या ठाण्यांना जोडूनच वसाहती आहेत. मात्र, सतत तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाण्याची पातळी सात मीटरपर्यंत खाली गेली. त्यामुळे पाण्याअभावी इतरांप्रमाणेच पोलीस कुटुंबियांचेही हाल झाले. अधीक्षक कार्यालयालाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. पोलीस प्रशासनाच्याच टँकरद्वारे उन्हाळ्यात येथे पाणीपुरवठा सुरु होता. कार्यालयासमोरील सुशोभिकरण जगविताना मोठी तारांबळ उडाली. दुष्काळाच्या संकटातून तावून, सुलाखून निघालेल्या पोलीस प्रशासनाने चांगलाच ‘धडा’ घेतला आहे. अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलीस वसाहती, अधीक्षक कार्यालय व सर्व ठाण्यांमधील बोअरचे जलपुनर्भरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी बीड पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी त्यांना ‘लो बजेट’चा ‘फॉर्म्यूला’ दिला. अवघ्या १५ ते २० हजार रुपयांत एका बोअरचे पुनर्भरण केले जात आहे.दोन वर्षांत ४ हजार ८०० रोपांची लागवड- पर्यावरण रक्षणातही बीडचे पोलीस प्रशासन मागे नाही. गतवर्षी २३०० रोपांची लागवड केली होती. दुष्काळी स्थितीतही ही रोपे जगविली आहेत. तर यंदा १ जुलै रोजी अडीच हजार झाडे लावण्यात आली आहेत.पर्यावरण रक्षणासाठीउन्हाळ्यात पाण्याची टंचाई ठिकठिकाणी जाणवली. त्यामुळे जल-पुनर्भरणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. पोलीस कल्याण निधीतून कमीतकमी खर्चात ही कामे करणे सुरु आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा म्हणून वृक्षारोपण करुन रोपेही जगविली आहेत.- अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, बीड.