शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

पाणीबचतीसाठी सरसावली खाकी वर्दी

By admin | Updated: July 10, 2016 02:47 IST

अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण

- संजय तिपाले, बीड

अल्पपर्जन्यमान, घटलेली पाणीपातळी व त्याचा जीवनमानावर झालेला थेट परिणाम या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने पाण्याच्या बाबतीत ठाणी व वसाहती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षलागवड मोहिमेसोबतच आता जलपुनर्भरणाची कामे तेथे युद्धपातळीवर सुरु आहेत.सर्व तालुक्यांचे ठिकाण व ग्रामीण भागात असलेल्या ठाण्यांना जोडूनच वसाहती आहेत. मात्र, सतत तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाण्याची पातळी सात मीटरपर्यंत खाली गेली. त्यामुळे पाण्याअभावी इतरांप्रमाणेच पोलीस कुटुंबियांचेही हाल झाले. अधीक्षक कार्यालयालाही टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. पोलीस प्रशासनाच्याच टँकरद्वारे उन्हाळ्यात येथे पाणीपुरवठा सुरु होता. कार्यालयासमोरील सुशोभिकरण जगविताना मोठी तारांबळ उडाली. दुष्काळाच्या संकटातून तावून, सुलाखून निघालेल्या पोलीस प्रशासनाने चांगलाच ‘धडा’ घेतला आहे. अधीक्षक अनिल पारसकर यांनी पोलीस वसाहती, अधीक्षक कार्यालय व सर्व ठाण्यांमधील बोअरचे जलपुनर्भरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी बीड पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी त्यांना ‘लो बजेट’चा ‘फॉर्म्यूला’ दिला. अवघ्या १५ ते २० हजार रुपयांत एका बोअरचे पुनर्भरण केले जात आहे.दोन वर्षांत ४ हजार ८०० रोपांची लागवड- पर्यावरण रक्षणातही बीडचे पोलीस प्रशासन मागे नाही. गतवर्षी २३०० रोपांची लागवड केली होती. दुष्काळी स्थितीतही ही रोपे जगविली आहेत. तर यंदा १ जुलै रोजी अडीच हजार झाडे लावण्यात आली आहेत.पर्यावरण रक्षणासाठीउन्हाळ्यात पाण्याची टंचाई ठिकठिकाणी जाणवली. त्यामुळे जल-पुनर्भरणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे. पोलीस कल्याण निधीतून कमीतकमी खर्चात ही कामे करणे सुरु आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा म्हणून वृक्षारोपण करुन रोपेही जगविली आहेत.- अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक, बीड.