शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुमचा भ्रष्टाचार काढत राहू- मुख्यमंत्री

By admin | Updated: February 8, 2017 21:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - महापालिकेतील भ्रष्टाचारावरून माध्यमांचे लक्ष हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने वल्गना केल्या जात आहेत, आव्हानाची भाषा वापरली जात आहे. मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही पारदर्शितेचा मुद्दा मांडणार आणि तुमचा भ्रष्टाचार काढत राहणार. आमची विकासकामे सांगणार आणि तुम्ही काय विकास केला हे विचारत राहणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुलुंड येथील आपल्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह स्थानिक आमदार आणि पालिका उमेदवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारच्या हवाल्याने मुंबई पारदर्शी कारभारात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. मात्र हा अहवाल वाचण्याची तसदीही शिवसेनेने घेतली नाही. केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात हैदराबाद आणि बेंगळुरूनंतर मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. हा तिसरा क्रमांकसुद्धा राज्य सरकारमुळे मिळाला आहे. महापालिकेसंदर्भात राज्य सरकारने जे चार अहवाल सादर केले, त्यात पैकीच्या पैकी गुण मिळाले. पात्र, पालिकेच्या ८ पैकी ५ वर्गात यांना भोपळाही फोडता आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या सल्लागारांनी अहवाल अर्धवट वाचला. सल्लागारांच्या माहितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळा आल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.मागील वर्षाचा कार्यअहवाल सादर करणे, वॉर्डनिहाय वित्तीय मागणीचा अहवाल, वर्षभरातील नागरी कामांची आकडेवारी, माहितीच्या अधिकारात आमसभेचे निर्णय कळविणे आणि पालिका अर्थसंकल्पात जनसहभाग या पाचही निकषात पालिकेला शून्य गुण मिळाले आहेत. मग कशाचा आधारावर पारदर्शी कारभाराचे होर्डिंग्ज लावता असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. वॉर्ड कमिटी नेमणे, जनजागृती अशा निकषात मुंबई पालिकेने गुण मिळविले आहेत. वॉर्ड कमिट्या नेमून पालिकेने असा कोणता तीर मारला. केंद्र सरकारच्या अहवालाचा नीट अभ्यास केला असता तर राज्य सरकारमुळेच तुमची इज्जत वाचली हे लक्षात आले असते, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- मुंबई पालिकेतील टेंडरचे मूल्यमापन केले असते, तर यांचा शेवटचा क्रमांक आला असता आणि मुंबईची बदनामी झाली असती. - राज्य सरकारने कोस्टल रोडची परवानगी रखडवल्याचा आरोप केला गेला. त्यावरही उत्तर आहे पण सगळेच आज उघड करणार नाही. कोस्टल रोडबाबत पुढच्या सभेत बोलेन. - सात वर्षं शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेच्या कामकाजाचा अंतर्गत लेखा अहवालच तयार होऊ दिला नाही. स्थायी समितीत ही अडवणूक करण्यात आली. - आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. निवडणुकीत टीआरपीचा कलगीतुरा करण्यासाठी आलो नाही. मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है; वही होता है जो मंजुरे खुदा होता है!, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले. - रामदास आठवले यांची कविता मुंबई में हार जायेगी शिवसेना, क्योंकि भाजप के साथ आयी हे भीम सेना, हम गा रहे बाबासाहेब और छत्रपतीजी का गाना, इस लिए मुंबईकर बोल रहे भाजपा और आरपीआय को साथ लाना...- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या निमित्ताने भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे मुखवटे लावून लोक आले होते.