शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

By admin | Updated: January 18, 2017 04:04 IST

पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार

कल्याण : पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार आहे. आगारांच्या डागडुजीला परिवहन उपक्रमाकडून प्रारंभ झाला असून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत वसंत व्हॅलीसह, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारांचा कायापालट केला जाणार आहे. केडीएमटीच्या उपक्रमाची २८ ठिकाणी आरक्षण आहेत. परंतु यातील गणेशघाट, वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगार वगळता अन्य कुठलीही आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात नाही. आजच्या घडीला केवळ गणेशघाट आगार सुरु असून उपक्रमाच्या सर्व बस तेथूनच सुटतात. परंतु आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र तिन्ही आगारांमध्ये सर्रास दिसते. खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यात पावसाळयातील चिखलाची दलदल पाहता तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅलीमधील आगाराच्या जागेतही पावसाळयात चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने येथेही आगाराबाहेर बस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे दोन्ही आगार उपक्रमासाठी निरूपयोगी ठरली आहेत. गणेशघाट आगाराची पुरती दुरवस्था झाली आहे. आगारात डांबरीकरण न झाल्याने पावसाळयात याठिकाणीही दलदल होते. आज ११० बस येथे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बस बाहेर काढताना गोंधळ उडतो. त्यातच पावसाळयात चिखलाचे साम्राज्य असल्याने तो तुडवतच चालकाला गाडीपर्यंत पोहचावे लागते. यामुळे सकाळच्या बस वेळेत बाहेर पडत नाहीत. या एकंदरीतच वास्तवतेवर ‘लोकमत’मध्ये ‘आॅन द स्पॉट’अंतर्गत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात बस आगारांची दुरवस्था, १७ वर्षात उपक्रमाला स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमले नाही, पांढरा हत्ता पोसता कशाला या मुद्यांकडे लक्ष वेधले होते. उत्पन्न आणि खर्चात तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात वीजअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचाही उल्लेख केला होता. पहिल्या टप्प्यात आगारांमध्ये डांबरीकरण आणि गटारांची कामे केली जाणार आहेत. यात वसंत व्हॅली आगारात डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. तर गणेशघाट आगारात सद्यस्थितीला गटार बांधणीचे काम सुरू असून लवकरच त्याठिकाणी डांबरीकरणाचे काम होणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या कालावधीसाठी नवीन ३० बस वसंत व्हॅली आगारातून होणार आहे. खंबाळपाडा आगारातही डांबरीकरण, गटारबांधणीचे होणार आहेत. (प्रतिनिधी) >दुरवस्थेतील कार्यालये सुधारावीतआगारातील कार्यालये मोडकळीस आली असून येथील स्वच्छतागृहे, रेकॉर्डरूमची देखील दुरवस्था झाली आहे. कार्यालयांमध्ये घुशी आणि उंदरांचा सतत वावर असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहातील पंखे बंद, दिव्याचा पुरेसा प्रकाश नाही, अंथरायला चटई नाही, पावसात गळके छप्पर असे चित्र असल्याने कर्मचाऱ्यांचीही परवड होते. देखभाल दुरूस्तीअभावी येथील रॅम्पला देखील पावसाळयात गळती लागते. सुसज्ज कार्यशाळा नसणे हेही बसच्या नादुरूस्तीचे कारण असून टायर, गाडयांचे स्पेअरपार्ट आगारात विखुरलेल्या अवस्थेत पडले आहेत. ही परिस्थितीही लवकर सुधारावी अशी भावना कर्मचाऱ्यांची आहे.