शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

केडीएमटीचे आगार टाकताहेत कात!

By admin | Updated: January 18, 2017 04:04 IST

पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार

कल्याण : पावसाळयात चिखलामुळे होणारी दलदल, यातून बस बाहेर काढताना चालकांची होणारी कसरत हे केडीएमटीच्या आगारांचे चित्र लवकरच बदलणार आहे. आगारांच्या डागडुजीला परिवहन उपक्रमाकडून प्रारंभ झाला असून डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. याअंतर्गत वसंत व्हॅलीसह, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारांचा कायापालट केला जाणार आहे. केडीएमटीच्या उपक्रमाची २८ ठिकाणी आरक्षण आहेत. परंतु यातील गणेशघाट, वसंतव्हॅली आणि खंबाळपाडा आगार वगळता अन्य कुठलीही आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात नाही. आजच्या घडीला केवळ गणेशघाट आगार सुरु असून उपक्रमाच्या सर्व बस तेथूनच सुटतात. परंतु आगाराच्या व्यवस्थेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने मोडकळीस आलेली कार्यालये हे चित्र तिन्ही आगारांमध्ये सर्रास दिसते. खंबाळपाडा आगारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या केल्या जातात. त्यात पावसाळयातील चिखलाची दलदल पाहता तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कल्याणमधील खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅलीमधील आगाराच्या जागेतही पावसाळयात चिखलाचे साम्राज्य पसरत असल्याने येथेही आगाराबाहेर बस उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे दोन्ही आगार उपक्रमासाठी निरूपयोगी ठरली आहेत. गणेशघाट आगाराची पुरती दुरवस्था झाली आहे. आगारात डांबरीकरण न झाल्याने पावसाळयात याठिकाणीही दलदल होते. आज ११० बस येथे उभ्या केल्या जातात. त्यामुळे बस बाहेर काढताना गोंधळ उडतो. त्यातच पावसाळयात चिखलाचे साम्राज्य असल्याने तो तुडवतच चालकाला गाडीपर्यंत पोहचावे लागते. यामुळे सकाळच्या बस वेळेत बाहेर पडत नाहीत. या एकंदरीतच वास्तवतेवर ‘लोकमत’मध्ये ‘आॅन द स्पॉट’अंतर्गत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात बस आगारांची दुरवस्था, १७ वर्षात उपक्रमाला स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमले नाही, पांढरा हत्ता पोसता कशाला या मुद्यांकडे लक्ष वेधले होते. उत्पन्न आणि खर्चात तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारात वीजअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींचाही उल्लेख केला होता. पहिल्या टप्प्यात आगारांमध्ये डांबरीकरण आणि गटारांची कामे केली जाणार आहेत. यात वसंत व्हॅली आगारात डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता गटार बांधणीच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. तर गणेशघाट आगारात सद्यस्थितीला गटार बांधणीचे काम सुरू असून लवकरच त्याठिकाणी डांबरीकरणाचे काम होणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर तात्पुरत्या कालावधीसाठी नवीन ३० बस वसंत व्हॅली आगारातून होणार आहे. खंबाळपाडा आगारातही डांबरीकरण, गटारबांधणीचे होणार आहेत. (प्रतिनिधी) >दुरवस्थेतील कार्यालये सुधारावीतआगारातील कार्यालये मोडकळीस आली असून येथील स्वच्छतागृहे, रेकॉर्डरूमची देखील दुरवस्था झाली आहे. कार्यालयांमध्ये घुशी आणि उंदरांचा सतत वावर असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहातील पंखे बंद, दिव्याचा पुरेसा प्रकाश नाही, अंथरायला चटई नाही, पावसात गळके छप्पर असे चित्र असल्याने कर्मचाऱ्यांचीही परवड होते. देखभाल दुरूस्तीअभावी येथील रॅम्पला देखील पावसाळयात गळती लागते. सुसज्ज कार्यशाळा नसणे हेही बसच्या नादुरूस्तीचे कारण असून टायर, गाडयांचे स्पेअरपार्ट आगारात विखुरलेल्या अवस्थेत पडले आहेत. ही परिस्थितीही लवकर सुधारावी अशी भावना कर्मचाऱ्यांची आहे.