शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘केडीएमसी’मध्ये समावेश नकोच

By admin | Updated: May 18, 2015 04:11 IST

पालिकेतून वगळलेली २७ गावे पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी सर्वपक्षीय संघर्ष समिती विरोधावर ठाम

प्रशांत माने, कल्याणपालिकेतून वगळलेली २७ गावे पुन्हा केडीएमसीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी सर्वपक्षीय संघर्ष समिती विरोधावर ठाम असून शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा तयारी समितीने सुरू केली आहे. तसेच विरोध दर्शविण्यासाठी लवकरच जनआंदोलनही छेडण्यात येणार असल्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.केडीएमसी ऐवजी स्वतंत्र नगरपालिकाच स्थापन करावी. आमचा समावेश कल्याण-डोंबिवली महापालिकेत करण्यात येऊ नये, या मागणीवर सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती कायम आहे. परंतु, वगळण्यात आलेली २७ गावे १ जूनपासून पुन्हा केडीएमसीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. याबाबत, संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून २७ गावांच्या मुद्यावर घेण्यात आलेली १८ हजार हरकतींवरील सुनावणी ही केवळ दिखावा ठरल्याची टीका त्यांनी केली. गावांचा ज्या वेळी महापालिकेत समावेश होता, त्या वेळेस स्थानिक ग्रामस्थांना सोयीसुविधांअभावी मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागले आहे. सद्य:स्थितीला महापालिकेत समावेश असलेली बल्याणी, आंबिवली, मोहिली ही गावेदेखील असुविधांमुळे महापालिकेतून बाहेर पडण्यासाठी लढा देत आहेत. ही वस्तुस्थिती असताना विकास करण्याची क्षमता नसलेल्या केडीएमसीत २७ गावांचा समावेश करण्याचा शासनाचा निर्णय हा निषेधार्ह असल्याचा आरोप समितीचा आहे. शासनाने अधिसूचना जारी करताना स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप समितीने केला असून विरोधाची दखल न घेणाऱ्या शासनाविरोधात आता जनआंदोलन छेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. प्रगती महाविद्यालयाच्या आगरी समाज मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत शासननिर्णयाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी गुलाब वझे, अर्जुनबुवा चौधरी, गजानन मंगरूळकर, वंडार पाटील, चंद्रकांत पाटील, विजय भाने यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.