शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दरवर्षी खचतोय काटवली घाट

By admin | Updated: July 8, 2017 20:46 IST

जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते

ऑनलाइन लोकमत
 
रस्ता समस्यांच्या गर्तेत : दगड, मुरुम टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी
 
पाचगणी (सातारा), दि. 8 - जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते. परंतु, काटवली घाट सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. गणेश पेठ, रुईघर येथील एका शाळेजवळचा रस्ता दरवर्षी सातत्याने खचत आहे. घाटातील खचणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकवेळी दगड, मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जातेय. 
 
जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर परिसरातील ग्रामस्थांना पाचगणीला जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने काटवली हा एकमेव मुख्य घाट मार्ग आहे. तरीही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
 
रस्त्याच्या दुतर्फा धनदांडग्यांनी जमीनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यातील अनेकांनी रस्त्याच्या मुख्य संरक्षण भिंतीवर ताबा मिळवीत अवैधरित्या तटभिंत उभारल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या घाटाची दूरवस्था झाली आहे. गटारे मुजून गेली आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पाण्याचं लोट रस्त्यावर येतात. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येऊनही बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे दूर्लक्षच करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
 
 
 अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक अवैध बांधकामे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेने झाली आहेत. यात प्रामुख्याने खालच्या बाजूस असणाºया संरक्षण भिंतीच काबीज केल्याने काही ठिकाणी संरक्षण कठडे आहेत की नाहीत अशा प्रश्न निर्माण होत आहे. एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने तर या संरक्षण भिंतीवरच स्वत:ची तटभिंत केली आहे. शाळेचे प्रवेशद्वारही रस्त्याच्या हद्दीत केल्याने त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही अधिकारी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. 
 
घाटातील रस्त्याकडेच्या अवैध बांधकामुळे भविष्यात तो आणखी अअरुंद होऊन घाट रस्ता मोकळा श्वास घेणार नाही. अनेक ठिकाणी घाटरस्ता खचला आहे. त्यावर मलमपट्टी केली जाते. एका ठिकाणी तर रस्ता सतत खचत चालला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही दरवर्षी भर टाकली जात आहे आणि टाकलेली भर खचत आहे तर ती भर का खचत आहे हे पाहणे गरजेचे आहे. 
 
... तर वाहतूक ठप्प
त्या ठिकाणी भिंतच खचली आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात घाट रस्ता पूर्ण बंद होऊ शकतो. कुडाळ, करहर परिसरातील कामकरी लोकांचा पांचगणी सतत संपर्क येतो. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.