शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी खचतोय काटवली घाट

By admin | Updated: July 8, 2017 20:46 IST

जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते

ऑनलाइन लोकमत
 
रस्ता समस्यांच्या गर्तेत : दगड, मुरुम टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी
 
पाचगणी (सातारा), दि. 8 - जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते. परंतु, काटवली घाट सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. गणेश पेठ, रुईघर येथील एका शाळेजवळचा रस्ता दरवर्षी सातत्याने खचत आहे. घाटातील खचणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकवेळी दगड, मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जातेय. 
 
जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर परिसरातील ग्रामस्थांना पाचगणीला जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने काटवली हा एकमेव मुख्य घाट मार्ग आहे. तरीही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
 
रस्त्याच्या दुतर्फा धनदांडग्यांनी जमीनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यातील अनेकांनी रस्त्याच्या मुख्य संरक्षण भिंतीवर ताबा मिळवीत अवैधरित्या तटभिंत उभारल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या घाटाची दूरवस्था झाली आहे. गटारे मुजून गेली आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पाण्याचं लोट रस्त्यावर येतात. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येऊनही बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे दूर्लक्षच करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
 
 
 अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक अवैध बांधकामे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेने झाली आहेत. यात प्रामुख्याने खालच्या बाजूस असणाºया संरक्षण भिंतीच काबीज केल्याने काही ठिकाणी संरक्षण कठडे आहेत की नाहीत अशा प्रश्न निर्माण होत आहे. एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने तर या संरक्षण भिंतीवरच स्वत:ची तटभिंत केली आहे. शाळेचे प्रवेशद्वारही रस्त्याच्या हद्दीत केल्याने त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही अधिकारी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. 
 
घाटातील रस्त्याकडेच्या अवैध बांधकामुळे भविष्यात तो आणखी अअरुंद होऊन घाट रस्ता मोकळा श्वास घेणार नाही. अनेक ठिकाणी घाटरस्ता खचला आहे. त्यावर मलमपट्टी केली जाते. एका ठिकाणी तर रस्ता सतत खचत चालला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही दरवर्षी भर टाकली जात आहे आणि टाकलेली भर खचत आहे तर ती भर का खचत आहे हे पाहणे गरजेचे आहे. 
 
... तर वाहतूक ठप्प
त्या ठिकाणी भिंतच खचली आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात घाट रस्ता पूर्ण बंद होऊ शकतो. कुडाळ, करहर परिसरातील कामकरी लोकांचा पांचगणी सतत संपर्क येतो. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.