शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

दरवर्षी खचतोय काटवली घाट

By admin | Updated: July 8, 2017 20:46 IST

जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते

ऑनलाइन लोकमत
 
रस्ता समस्यांच्या गर्तेत : दगड, मुरुम टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी
 
पाचगणी (सातारा), दि. 8 - जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते. परंतु, काटवली घाट सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. गणेश पेठ, रुईघर येथील एका शाळेजवळचा रस्ता दरवर्षी सातत्याने खचत आहे. घाटातील खचणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकवेळी दगड, मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जातेय. 
 
जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर परिसरातील ग्रामस्थांना पाचगणीला जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने काटवली हा एकमेव मुख्य घाट मार्ग आहे. तरीही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
 
रस्त्याच्या दुतर्फा धनदांडग्यांनी जमीनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यातील अनेकांनी रस्त्याच्या मुख्य संरक्षण भिंतीवर ताबा मिळवीत अवैधरित्या तटभिंत उभारल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या घाटाची दूरवस्था झाली आहे. गटारे मुजून गेली आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पाण्याचं लोट रस्त्यावर येतात. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येऊनही बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे दूर्लक्षच करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
 
 
 अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक अवैध बांधकामे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेने झाली आहेत. यात प्रामुख्याने खालच्या बाजूस असणाºया संरक्षण भिंतीच काबीज केल्याने काही ठिकाणी संरक्षण कठडे आहेत की नाहीत अशा प्रश्न निर्माण होत आहे. एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने तर या संरक्षण भिंतीवरच स्वत:ची तटभिंत केली आहे. शाळेचे प्रवेशद्वारही रस्त्याच्या हद्दीत केल्याने त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही अधिकारी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. 
 
घाटातील रस्त्याकडेच्या अवैध बांधकामुळे भविष्यात तो आणखी अअरुंद होऊन घाट रस्ता मोकळा श्वास घेणार नाही. अनेक ठिकाणी घाटरस्ता खचला आहे. त्यावर मलमपट्टी केली जाते. एका ठिकाणी तर रस्ता सतत खचत चालला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही दरवर्षी भर टाकली जात आहे आणि टाकलेली भर खचत आहे तर ती भर का खचत आहे हे पाहणे गरजेचे आहे. 
 
... तर वाहतूक ठप्प
त्या ठिकाणी भिंतच खचली आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात घाट रस्ता पूर्ण बंद होऊ शकतो. कुडाळ, करहर परिसरातील कामकरी लोकांचा पांचगणी सतत संपर्क येतो. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.