शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य जपणारी कातुर्लीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे.

ठळक मुद्देभौतिक सुविधेवर भर : लोकसहभागासह ग्रामपंचायतीचेही सहकार्य, गटशिक्षणाधिकाऱ्यांचीही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सहा दशकांपूर्वी पवनी पंचायत समिती अंतर्गत स्थापित करण्यात आलेली कातुर्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावासाठी शान ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रूजविणारी शाळा म्हणून ओळखली जात आहे. मुलांची शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य यासह शिक्षकांचे प्रयत्न नावारुपास येत आहे.१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे. शाळेतील आतील व बाहेरील भागात पेव्हर ब्लॉक सबमर्सीबल स्वच्छता गृह आदी कामे करण्यात आली आहेत. याशिवाय नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बेसीक नॉलेज, रोज एक वर्ग एक म्हण, बचत बँक, शैक्षणिक साहित्य स्टॉल यासह स्नेहसंमेलन, जयंती उपक्रम आदी कार्यक्रम घेतले जात आहेत.शाळेची भौतीक स्थिती आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी चंग बांधला आहे. यात पालकांच्या सहकार्याने तो बदल घडवून आणला. शिस्त, मूल्य यांची घडण विद्यार्थ्यांमध्ये देण्यास ही शाळा यशस्वी ठरली आहे.५२ हजारांची लोकवर्गणीशाळेत विविध कामे करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणी गोळा करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या अंतर्गत जवळपास ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यात शाळा, रंगरंगोटी, स्वच्छता करणे यासह आदी कामे केली जात आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या या कामात विद्यार्थ्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. शिस्त व अनुशासन यांचे पालन नित्यनियमाने केले जात आहे.शाळेत भौतीक बदल घडवून आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीसह सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.-अशोक तिडके, मुख्याध्यापकशिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ झाली आहे. यासह गटशिक्षणाधिकारी एन.टी. टिचकुले व केंद्रप्रमुख बी.आर. मेश्राम यांचेही सहकार्य आहे.-खुशाल शहारे, अध्यक्ष शा.समिती

टॅग्स :Schoolशाळा