शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:58 IST

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं.

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं. पूर्वी देशातील छोट्या शहरांतून अनेक खेळाडू आले, पण त्यांना आपली छाप पाडता आली नाही. कपिलने मात्र सर्व चित्रच बदलून टाकत भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मांडले.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी क्रिकेटवर लिहिलेल्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांच्या हस्ते सोमवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले.या वेळी माधव आपटे, नरी कॉन्टेÑक्टर, अजित वाडेकर, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर आणि दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पाडला.या वेळी हर्षा भोगले, गावसकर, तेंडुलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी जुन्या आठवणी, आधुनिक क्रिकेट आणि खेळाडूंची बदललेली मानसिकता यावर चर्चा करत कार्यक्रमात रंग भरले.गावसकर म्हणाले की, ‘कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा विश्वास दिला. त्याआधी मेट्रो शहरातील खेळाडू आपले वर्चस्व गाजवत होते. पण कपिलने हे चित्र बदलले. आज भारताची वेगवान गोलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे आणि माझ्या मते याचे सर्व श्रेय कपिलला जाते. कपिलचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे.’त्याचप्रमाणे आज क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जात आहे. याविषयी सचिन म्हणाला की, ‘नक्कीच आज तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आले आहे आणि हे सर्व आयपीएलमुळे झाले आहे.आज भारतीय संघ समतोल दिसत आहे. गोलंदाजदेखील चांगली फलंदाजी करताना दिसतात,जे भारतासाठी खूप चांगले आहे. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघाला अधिक बळकटी येत आहे.’>भारतीय संघात आल्यापासून विराट कोहलीच्या स्वभावामध्ये बदल झालेला नाही. मी त्याच्यातील जोश बघितला असून अनेकांना त्याचा जोश पसंत नव्हता. तसेच, अनेक जण त्याच्यावर टीकाही करत होते. मात्र, आज हाच जोश भारतीय संघाची मजबूत बाजू बनला आहे. कोहलीमध्ये फारसा बदल झाला नाही, मात्र त्याच्या आजूबाजूचे लोक नक्कीच बदलले. माझ्या मते एक खेळाडू म्हणून स्वत:ला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे.- सचिन तेंडुलकर

टॅग्स :Cricketक्रिकेटSachin Tendulkarसचिन तेंडूलकर