शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:58 IST

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं.

मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं. पूर्वी देशातील छोट्या शहरांतून अनेक खेळाडू आले, पण त्यांना आपली छाप पाडता आली नाही. कपिलने मात्र सर्व चित्रच बदलून टाकत भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मांडले.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी क्रिकेटवर लिहिलेल्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांच्या हस्ते सोमवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले.या वेळी माधव आपटे, नरी कॉन्टेÑक्टर, अजित वाडेकर, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर आणि दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पाडला.या वेळी हर्षा भोगले, गावसकर, तेंडुलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी जुन्या आठवणी, आधुनिक क्रिकेट आणि खेळाडूंची बदललेली मानसिकता यावर चर्चा करत कार्यक्रमात रंग भरले.गावसकर म्हणाले की, ‘कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा विश्वास दिला. त्याआधी मेट्रो शहरातील खेळाडू आपले वर्चस्व गाजवत होते. पण कपिलने हे चित्र बदलले. आज भारताची वेगवान गोलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे आणि माझ्या मते याचे सर्व श्रेय कपिलला जाते. कपिलचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे.’त्याचप्रमाणे आज क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जात आहे. याविषयी सचिन म्हणाला की, ‘नक्कीच आज तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आले आहे आणि हे सर्व आयपीएलमुळे झाले आहे.आज भारतीय संघ समतोल दिसत आहे. गोलंदाजदेखील चांगली फलंदाजी करताना दिसतात,जे भारतासाठी खूप चांगले आहे. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघाला अधिक बळकटी येत आहे.’>भारतीय संघात आल्यापासून विराट कोहलीच्या स्वभावामध्ये बदल झालेला नाही. मी त्याच्यातील जोश बघितला असून अनेकांना त्याचा जोश पसंत नव्हता. तसेच, अनेक जण त्याच्यावर टीकाही करत होते. मात्र, आज हाच जोश भारतीय संघाची मजबूत बाजू बनला आहे. कोहलीमध्ये फारसा बदल झाला नाही, मात्र त्याच्या आजूबाजूचे लोक नक्कीच बदलले. माझ्या मते एक खेळाडू म्हणून स्वत:ला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे.- सचिन तेंडुलकर

टॅग्स :Cricketक्रिकेटSachin Tendulkarसचिन तेंडूलकर