शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कपिल शर्माचा ‘हास्यास्पद’ शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 07:23 IST

कपिल शर्माने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ५ लाखांची लाच मागितल्याचे टिवट करताच दिवसभर राष्ट्रीय बातमीचा विषय बनलेले हे प्रकरण संध्याकाळपर्यंत वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले

मुंबई : भल्या पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी विनोदवीर कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे टि्वट करताच दिवसभर राष्ट्रीय बातमीचा विषय बनलेले हे प्रकरण संध्याकाळपर्यंत वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले. ज्या बांधकामासाठी लाचखोरीचा आरोप केला, ते बांधकामच अनधिकृत असल्याचे समोर आल्याने कपिलचा पुरता ‘फ्लॉप’ शो झाला! वर्सोवा येथील कार्यालयाच्या कामाकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यानी ५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप कपिल शर्माने टिष्ट्वटद्वारे केला. शिवाय, हे टिष्ट्वट त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले. कपिल या टिष्ट्वटमध्ये केवळ आरोप करून थांबलेला नाही, तर आपण आत्तापर्यंत १५ कोटींचा कर भरल्याचे म्हणत ‘हेच का अच्छे दिन,’ असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली. दुसरीकडे कपिलच्या टिष्ट्वटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने या प्रकरणी दिवसभर चांगलीच ‘टिवटिव’ रंगली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कपिल शर्माला अधिकृतरित्या पत्र लिहून तो लाचखोर कोण? अशी विचारणा केली. मात्र ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी लाच मागितल्याचे कपिल सांगतोय, ते कार्यालयच अनधिकृत असल्याचे समोर येत आहे. महापालिकेने १६ जुलै २०१६ रोजी कपिल शर्माला पाठविलेल्या नोटीशीत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. या नोटीशीची एक प्रत वर्सोवा पोलिसांनाही पाठवण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कदम यांचे सायबर पोलिसांना पत्रकपिल शर्माने केलेल्या टिष्ट्वटच्या चौकशीसाठी सायबर पोलिसांना भाजपचे आमदार राम कदम यांनी पत्र लिहिले आहे. कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर सायबर सेलने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावे, असे पत्रात म्हटले आहे. आम्हाला अर्ज मिळालेला असून याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपिल मुख्यमंत्र्यांना भेटणारदरम्यान, प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता दिसताच कपिलने आपल्या टिष्ट्वटची दखल घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत भेटण्याची ईच्छा व्यक्त केली.>कपिलभाई, नाव जाहीर करा!कपिलच्या टिष्ट्वटला काही क्षण उलटताच त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ‘कपिलभाई कृपया नाव जाहीर करा. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात सोडणार नाही,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कपिलला आश्वस्त केले. राणेंचे व्हिडीओ टिष्ट्वट : कपिलच्या तक्रारीची तत्काळ दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले. ‘कपिल शर्माच्या टिष्ट्वटची लगेच दखल घेतली जाते. पण मी गेल्या अनेक वर्षांपासून हाच मुद्दा उचलत असूनही याकडे लक्ष दिले जात नाही,’ असा उपाहासात्मक टोला नितेश यांनी लगावला. कपिलचा मुखवटा घालून त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला.