शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

कान्होजीराजे आंग्रे घराण्याच्या 282 वर्षांच्या प्राचीन परंपरेच्या गौरीचे घेरीयामध्ये आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 20:47 IST

आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.

जयंत धुळप, ऑनलाइन लोकमत

अलिबाग, दि. 8 - तब्बल 282 वर्षांची प्राचीन परंपरा असणा-या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.आंग्रे घराण्याच्या या गौरीची प्राचीन परंपरा सर्वप्रथम, सरखेल कान्होजीराजे यांचे पुत्र व स्वराज्याचे तृतीय सरखेल संभाजीराजे आंग्रे यांच्या कालखंडात सन 1733-1734 मध्ये सुरू झाली असल्याचा पहिला संदर्भ उपलब्ध आहे. त्या वेळी गौरी साठीचा खर्च दप्तरी नमूद केलेला आढळला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी गुरुवारी संध्याकाळी लोकमतशी बोलताना दिली आहे.सद्यस्थितीत अलिबागच्या समुद्रात अस्तित्वात असलेल्या कुलाबा किल्ल्यातील नानीसाहेबांचा वाडा या नावाने ओळखल्या जाणा-या वाड्यात संभाजीराजे आंग्रे यांनी 1733-1734 मध्ये सर्वप्रथम गौर आणल्याचीही नोंद उपलब्ध आहे. कुलाबा किल्ल्यातील शेवटच्या महाभयानक अग्निप्रलयात हा नानीसाहेबांचा वाडा भस्मसात झाला. मात्र त्याचे अवशेष आपल्या किल्ल्यात गणेश मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला आजही दिसून येतात, अशीही माहिती त्यांनी अखेरीस दिली.(छाया-जयंत धुळप)