शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

वनविभागात पुन्हा एकदा बदली वॉर; कणकवली वनक्षेत्रपाल बदली वादात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 19:23 IST

कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोनवणे यांचा कातकरी प्रकरणात बळी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

सावंतवाडी : सिंधुदुर्ग वनविभागात पुन्हा एकदा बदली वॉर सुरू झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरत काही अधिकाऱ्यांनी क्रिम पोस्टिंगसाठी प्रयत्न चालवले आहेत. यातून कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोनवणे यांचा कातकरी प्रकरणात बळी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या मर्जीतील माणसाला रत्नागिरीतून आणून कणकवलीचा कार्यभार दिल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली असून, या मागे वनविभागातील शकूनीमामा वेगळाच असल्याचे बोलले जात आहे.

कणकवली येथे कातकरी समाज्याच्या काही लोकांना माराहण झाल्यानंतर त्यांनी तेथील पाच वनकर्मचाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळ व माराहण प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात वनविभागाची नाचक्की झाली असतना आता वनविभागातील अंर्तगत वादाला तोंड फुटले आहे. वनमंत्र्याच्या मर्जीतील असलेले दीपक सोनवणे यांना चक्क कणकवली वनक्षेत्रपाल प्रभारी पदी बसवण्यात आले होते. पण वनमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचा काटा काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यातील पहिला बळी दीपक सोनवणे हे ठरले आहेत. कातकरी माराहण प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या पाठीशी वनक्षेत्रपाल राहिले नाही, असा ठपका ठेवून त्यांना अचानक बाजूला करण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण झाले तेव्हा सोनवणे यांना उपवनसंरक्षक शाहाजी नारनवर यांनी मुंबई येथे सरकारी कामासाठी पाठवले होते. मग ते पाठीशी राहिले नाही हे कितपत योग्य, असा सवाल आता वनकर्मचारीच विचारायला लागले आहेत.

दुसरीकडे ज्या रमेश कांबळे यांना कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार देण्यात आला त्यांची बरीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा झाली असून, रत्नागिरी येथे त्यांची फिरत्या पथकात बदली झाली. पण त्यांचा कार्यकाल अद्याप पूर्ण झाला नाही, असे असतना सिंधुदुर्ग मधील कार्यभार रत्नागिरीतील अधिकांऱ्यांकडे कसा काय देण्यात आला, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यातच चिपळूण वनक्षेत्रपालपदी अद्याप कोणतीही व्यक्ती नाही मग कणकवली वरच एवढी मेहरबानी का? यात सोनवणेंचा बळी देऊन आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याला या जागेवर आणल्याची चर्चा सध्या सुरू असून, या बदली प्रकरणात एक निवृत्त अधिकारी पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही कणकवली येथील अधिकाऱ्यांना एवढ्या तडकाफडकी का हटवले, याची माहिती सध्या घेत असून, या प्रकरणात पडद्यामागून कोणता निवृत्त अधिकारी सूत्रे हलवत असेल तर मुख्य वनसंरक्षकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहोत. एखाद्या अधिकाऱ्याची पूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे. असे असताना त्याला का बदलण्यात आले तसेच कणकवलीतील जागेवर रत्नागिरीतील व्यक्ती कशासाठी, असा सवाल ही उपरकर यांनी विचारला आहे.

अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागणार

कणकवली वनक्षेत्रपाल दीपक सोनवणे यांनी आपल्यावर अन्याय झाला असून,आपण लवकरच अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. माझ्याबाबत तक्रारी आहेत. तर मग माझे स्पष्टीकरण न घेताच का कारवाई करण्यात आली, असा सवाल सोनवणे यांनी विचारला आहे. कातकरी प्रकरणात माझी कोणतीही चूक नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागKankavliकणकवली