शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

‘कमळा’ची कमाल!

By admin | Updated: February 24, 2017 07:24 IST

देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदानाचा

देशभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का प्रथमच पन्नाशीपार गेला व ५५ टक्के मतदान झाले. या वाढीव मतदानाचा आकडा पुढे आल्यावर त्याचा भाजपाला लाभ होणार, असा अंदाज व्यक्त झाला. तो खरा ठरला. भाजपाने या वाढीव मतदानाच्या जोरावर थेट ८२ जागा मिळवल्याने आता सर्वांत मोठा पक्ष ठरूनही शिवसेनेसाठी सत्ता रथापनेचा मार्ग खडतर झाला आहे. भाजपाचा कौल निर्णायक ठरणार आहे.मुंबई : शिवसेनेसाठी अस्तित्वाची व भाजपाकरिता प्रतिष्ठेची ठरलेली मुंबई महापालिकेची लढाई यंदा आश्चर्यकारकरीत्या बरोबरीत सुटली आहे़ स्वबळावर सत्तेचा दावा करणाऱ्या शिवसेनेने मागील निवडणुकीपेक्षा एक पाऊल पुढे जात ८५ जागा मिळवल्या़ तरी शतक न मारता आल्याने शिवसेनेचा हिरमोड झाला, तर भाजपाने तब्बल तीनपट झेप थेट ८२ जागांवर मुसंडी मारत कमाल केली. या दोन्ही पक्षांच्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व विरोधी पक्ष अवघ्या ६० जागांवर आटोपले़ गेली २५ वर्षे शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या भाजपाने ‘मिशन शंभर’ असे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेला टार्गेट केले़ विजय खेचून आणण्यासाठी भाजपाची यंत्रणाही कामाला लागली़ यामुळे या निवडणुकीत अटीतटीची झुंज झाली. मतदारांनीही गेल्या २५  वर्षांत प्रथमच सर्वाधिक ५५ टक्के  मतदान केले़ २०१२ च्या तुलनेत झालेले  हे ११ टक्के वाढीव मतदानच निर्णायक  ठरले़ २०१२ मध्ये भाजपाला ३२ जागा मिळाल्या होत्या़ या जागांमध्ये दुप्पट वाढ होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती़ आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत शिवसेनाच ९० ते १०० जागांवर आघाडीवर होती़ मात्र भाजपाने अनपेक्षित मुसंडी मारत ८२ जागांवर विजय मिळवला़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघ्या सात जागा मिळाल्या. तर ‘एमआयएम’ने दोन जागांवर  विजय मिळवला आहे़ (प्रतिनिधी)50 जागा भाजपाच्या वाढल्याया निवडणुकीत युती तुटल्याचा सर्वाधिक लाभ भाजपाचा झाला. तब्बल ५० जागा वाढल्याने सत्तेचा दावेदार ठरला आहे.09 जागा शिवसेनेच्या वाढल्यायुती तोडल्याचा अपेक्षित लाभ शिवसेनेला झाला नसला तरी १० जागा वाढल्याने शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला.21 जागा काँग्रेसच्या घटल्यापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची मोठी घसरण झाली.114 महानगरपालिकेतील सत्तेसाठी ११४ जागांची गरज असून हा आकडा कोण व कसा गाठणार हा प्रश्न आहे.

 

( ELECTION RESULT-शिवरायांच्या आशीर्वादाचा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना विसर