शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

काळानुरुप ‘कोल्हापुरी’त बदल आवश्यक

By admin | Updated: May 6, 2017 00:36 IST

सुभाष देसाई : जागतिक बाजारपेठेत मोठी संधी; कोल्हापुरी चप्पल कारागिरांची कार्यशाळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मूळ स्वरूप कायम ठेवून काळानुरुप ‘कोल्हापुरी चप्पल’मध्ये बदल केल्यास जागतिक बाजारपेठ सहज काबीज करता येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी केले. शाहू स्मारक भवन येथे जिल्ह्यातील चप्पल बनविणाऱ्या कारागिरांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, बाटा कंपनीच्या माजी उपाध्यक्ष किरण जोशी, चॅप्पर कंपनीचे हर्षवर्धन पटवर्धन, देशी हँग ओव्हरचे हितेश केंजळे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री देसाई म्हणाले, जगात ‘कोल्हापुरी चप्पल’ची एक स्वतंत्र ओळख असून, ही चप्पल अत्यंत चांगली व मजबूत आहे. मूळ ओळख कायम ठेवून ग्राहकांच्या मागणीनुसार काळानुरूप बदल केल्यास कोल्हापुरी चप्पला जागतिक बाजारपेठ सहजपणे काबीज करेल. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. कोल्हापुरी चप्पल बनविणारे कारागीर केंद्रबिंदू मानून तो कधीही नजरेआड होणार नाही, अशा पद्धतीने योजना आखल्या जातील.विशाल चोरडिया म्हणाले, जगात फुटवेअर इंडस्ट्री झपाट्याने वाढत असून, त्यात कोल्हापुरी चप्पलला फार मोठी संधी आहे. १० ते १५ कोटींचा व्यवसाय असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलसाठी जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. रिचा बागला यांनी जवळपास ५ हजार चर्मोद्योग कारागीर आहेत, असे सांगून कोल्हापुरी चपलांना जगभरात मागणी आहे. ही कला टिकविणे, सक्षम विक्री व्यवस्था उभी करणे, कारागीरांना आर्थिक मदत देणे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.कठीणपणावर संशोधन आवश्यककोल्हापुरात येणारा पर्यटक कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय राहत नाही; पण या चपलेचा वापर मात्र प्रसंगानुरूपच होतो. कोल्हापुरी चप्पल दैनंदिन वापरले जावे यासाठी तसेच त्याचा कठीणपणा कमी करण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार, फॅशननुसार चप्पल उत्पादनात बदल करा, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. ‘पेटंट’चा विषय मार्गी लावू‘कोल्हापुरी चप्पल’ला जगभर ओळख निर्माण करून देण्यासाठी याच्या ‘पेटंट’बाबतचाही विषय मार्गी लावण्यात येईल. बदल स्वीकारून विकास करीत असताना कारागीर केंद्रबिंदू मानला जाईल, तो कधीही नजरेआड होऊ देणार नाही, असे अभिवचनही मंत्री देसाई यांंनी यावेळी दिले. राज्यात १२० कला आढळल्याराज्याच्या विविध भागांमध्ये महत्त्वाच्या अशा १२० कला आढळून आल्या आहेत. त्यामध्ये कोकणचा काथ्या उद्योग, सावंतवाडीची खेळणी, हुपरीचे चांदीचे दागिने, विदर्भातील बांबू, पैठणची पैठणी, हिमरू चादरी आदींचा समावेश आहे. या सर्वांमध्ये ‘कोल्हापुरी चप्पल’ हे अत्यंत महत्त्वाचे उत्पादन आहे.या सर्व पारंपरिक कला चिरकाल टिकविण्यासाठी व ग्रामीण भागातील कारागीरांना स्थैर्य देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कौटुंबिक पद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायांमध्ये व्यावसायिक स्थैर्य आणणे आवश्यक आहे. बदलत्या काळाचा वेध घेऊन या कलात्मक उत्पादनामध्ये व विक्री व्यवस्थेमध्ये बदल केल्यास, कला व कारागीर या दोघांचाही चांगला फायदा होईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.उद्योगासाठी पाच लाखांचे कर्ज द्यावेया कार्यक्रमात कारागिरांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या मागण्या मांडल्या. उद्योगासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, शासनाने कच्चा माल उपलब्ध करून द्यावा आणि खादी ग्रामोद्योगाने अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, ६० वर्षांवरील कारागिरांना पेन्शन सुरू करावी, अशा मागण्या कारागिरांच्यावतीने करण्यात आल्या. ‘कोल्हापुरी चप्पल’चे नवे दालन व्हावेसध्या कोल्हापुरी चप्पल जवळपास १५ विशिष्ट डिझाईन्समध्येच उपलब्ध आहेत. बाजारपेठेत सध्या चप्पलाच्या असंख्य फॅशन्स उपलब्ध होत आहेत. त्यामुळे प्रत्येक फॅशनसाठी कोल्हापुरी चप्पलचे नवे फुटवेअर दालन निर्माण होण्याची गरज आहे, असे चोरडिया यांनी सांगितले.