शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कदमने बँक मॅनेजरला धमकावले होते

By admin | Updated: August 21, 2015 00:57 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार रमेश कदम कायद्याच्या पकडीतून सुटू नये म्हणून सीआयडीने

डिप्पी वांकाणी, मुंबईलोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित आमदार रमेश कदम कायद्याच्या पकडीतून सुटू नये म्हणून सीआयडीने केलेली विशेष सरकारी वकील देण्याची मागणी मान्य झाली आहे. त्यानुसार कदमच्या विरोधातील खटल्यात प्रवीण चव्हाण सरकारच्या वतीने बाजू मांडतील. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) अंतर्गत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या महामंडळाचा पैसा ज्या बँकांमध्ये ठेवण्यात आला होता त्या बँकांच्या व्यवस्थापकांना रमेश कदमने धमक्या दिल्या होत्या. बुलडाण्याच्या महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाने मोठी रक्कम काढण्यास नकार दिल्यावर रमेश कदमने त्यांना ‘ये पैसा हमारा है. तेरे पास सिर्फ रखने को दिया है,’ अशा शब्दांत धमकावले होते. रमेश कदमने ५५ कोटी रुपये बँकेतून काढले होते, असे सीआयडीला आढळले. हा पैसा त्याने निवडणुकीत वापरला. या भ्रष्टाचाराची व्याप्ती (३८५ कोटी रुपये) आणि या प्रकरणात असलेले अनेक तांत्रिक पुरावे बघता आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला ज्येष्ठ वकिलाची गरज आहे. या खटल्यात राज्याची बाजू विशेष सरकारी वकिलाने मांडावी असा प्रस्ताव आम्ही मांडला. त्यानुसार नेमलेल्या प्रवीण चव्हाण यांनी यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांविरुद्धच्या मोठ्या खटल्यात सरकारची बाजू मांडली आहे, असे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटींवर सांगितले.साठे महामंडळाचे खाते असलेल्या बँकांमधून कदमने इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने काढून घेतलेल्या ५५ कोटी रुपयांचा शोध आम्ही आता घेत आहोत, असेही हा अधिकारी म्हणाला. रमेश कदमने बीड, हिंगोली, भंडारा, परभणी, जालना आणि बुलडाणा येथून हे ५५ कोटी रुपये काढले. एवढी मोठी रक्कम काढताना अधिकाऱ्यांनी विचारणा केली असताना रमेश कदमने मातंग समाजातील गरजू व्यक्तींना गाय, म्हैस, शेळ्यांसारखी जनावरे विकत घेण्यासाठी मी मदत करणार आहे. कारण ही जनावरे विकणारा चेक घेत नाही व त्यामुळे त्यांना रोख रकमेची गरज आहे, असे सांगितले. त्या त्या ठिकाणचे व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांनी त्याच्याशी हातमिळवणी होती, असे हा अधिकारी म्हणाला.हा अधिकारी म्हणाला की, ‘‘कदमने खर्च केलेल्या ५५ कोटी रुपयांचा माग काढणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्याने हा पैसा बँक व्यवहारांद्वारे खर्च केला असून, त्यांचे पुरावे हे आॅनलाइन आहेत. परंतु ५५ कोटी रुपये परत मिळविणे हे आमच्यासाठी मोठे आव्हान आहे. त्याने हे पैसे काढले ती वेळ महत्त्वाची आहे कारण तेव्हा निवडणुकांची घोषणा होणार होती. त्याने हा पैसा त्याच्या निवडणुकीतील प्रचारासाठी वापरला असावा, असा आमचा संशय असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.