शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

हा तर फक्त ‘टे्रलर’, पाऊस बाकी आहे

By admin | Updated: June 13, 2016 02:29 IST

मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.

मुंबई : मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होताच, महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. प्रत्यक्षात मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला पश्चिम व अंधेरी पूर्व येथे तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने रहिवाशांना त्रास झाल्याने वॉचडॉग फाउंडेशनने महापालिकेवर सडकून टीका करत, हा तर फक्त ‘टे्रलर’ असल्याचे म्हटले आहे.मुंबई शहर आणि उपनगरात थोडासा मुसळधार पाऊस पडला, तरी ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र, यंदा मान्सूनपूर्व कामांची जय्यत तयारी करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचणार नाही; असा दावा महापालिकेने केला आहे. शनिवारी सकाळी जेव्हा पावसाने सुरुवात केली, तेव्हा महापालिकेने हिंदमाता आणि वांद्रे येथील सखल ठिकाणी कर्मचारी तैनात करत पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक काहीशी कोलमडल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, मरोळसह लगतच्या परिसरात आणि वांद्रे येथील झोपड्यांच्या वस्तीत पाणी साचले, शिवाय कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार आणि लगतच्या चाळींमध्येही छोटी गटारे तुडुंब भरल्याचे निदर्शानास आले. मुळात येथील छोटी आणि मोठी गटारे साफ करण्यात आली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या, असे स्थानिकांनी सांगितले. साहजिकच, येथील छोटी गटारे मोठ्या गटारांना जोडण्यात आली आहेत. मोठ्या गटारांतील कचरा काढण्यात आलेला नाही आणि ही मोठी गटारे लगतच्या मिठी नदीत सोडण्यात आली आहेत. दुसरीकडे मिठीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह आहे. किंचितशा पावसाने घर-गल्ल्यांसह सखल चाळीत पाणी साचल्याने मोठा पाऊस झाल्यावर काय होईल? असा सवालही मरोळ आणि कुर्ला येथील रहिवाशांनी केला आहे.मुंबईतील नागरी समस्यांचा अभ्यास असणारे वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात पालिका साफसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना धारेवर धरत नाही. आयुक्त असोत वा प्रशासन स्तरावरील अधिकारी, संबंधितांनी कंत्राटदारांना लगाम घातल्याशिवाय पावसाळ्यातील कामे मार्गी लागणारच नाहीत. दरवर्षी जसा पावसाळा येतो, तसे दरवर्षी पालिका साफसफाईची कामे हाती घेते. मात्र, पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. किमान या वर्षी तरी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना फैलावर घेतले, तर मान्सून दाखल होत असतानाच, ज्या ठिकाणची नालेसफाईची अथवा पावसाळापूर्व कामे शिल्लक आहेत, ती पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. (प्रतिनिधी)