शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हा तर फक्त ‘टे्रलर’, पाऊस बाकी आहे

By admin | Updated: June 13, 2016 02:29 IST

मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.

मुंबई : मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होताच, महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. प्रत्यक्षात मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला पश्चिम व अंधेरी पूर्व येथे तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने रहिवाशांना त्रास झाल्याने वॉचडॉग फाउंडेशनने महापालिकेवर सडकून टीका करत, हा तर फक्त ‘टे्रलर’ असल्याचे म्हटले आहे.मुंबई शहर आणि उपनगरात थोडासा मुसळधार पाऊस पडला, तरी ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र, यंदा मान्सूनपूर्व कामांची जय्यत तयारी करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचणार नाही; असा दावा महापालिकेने केला आहे. शनिवारी सकाळी जेव्हा पावसाने सुरुवात केली, तेव्हा महापालिकेने हिंदमाता आणि वांद्रे येथील सखल ठिकाणी कर्मचारी तैनात करत पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक काहीशी कोलमडल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, मरोळसह लगतच्या परिसरात आणि वांद्रे येथील झोपड्यांच्या वस्तीत पाणी साचले, शिवाय कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार आणि लगतच्या चाळींमध्येही छोटी गटारे तुडुंब भरल्याचे निदर्शानास आले. मुळात येथील छोटी आणि मोठी गटारे साफ करण्यात आली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या, असे स्थानिकांनी सांगितले. साहजिकच, येथील छोटी गटारे मोठ्या गटारांना जोडण्यात आली आहेत. मोठ्या गटारांतील कचरा काढण्यात आलेला नाही आणि ही मोठी गटारे लगतच्या मिठी नदीत सोडण्यात आली आहेत. दुसरीकडे मिठीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह आहे. किंचितशा पावसाने घर-गल्ल्यांसह सखल चाळीत पाणी साचल्याने मोठा पाऊस झाल्यावर काय होईल? असा सवालही मरोळ आणि कुर्ला येथील रहिवाशांनी केला आहे.मुंबईतील नागरी समस्यांचा अभ्यास असणारे वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात पालिका साफसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना धारेवर धरत नाही. आयुक्त असोत वा प्रशासन स्तरावरील अधिकारी, संबंधितांनी कंत्राटदारांना लगाम घातल्याशिवाय पावसाळ्यातील कामे मार्गी लागणारच नाहीत. दरवर्षी जसा पावसाळा येतो, तसे दरवर्षी पालिका साफसफाईची कामे हाती घेते. मात्र, पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. किमान या वर्षी तरी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना फैलावर घेतले, तर मान्सून दाखल होत असतानाच, ज्या ठिकाणची नालेसफाईची अथवा पावसाळापूर्व कामे शिल्लक आहेत, ती पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. (प्रतिनिधी)