शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

हा तर फक्त ‘टे्रलर’, पाऊस बाकी आहे

By admin | Updated: June 13, 2016 02:29 IST

मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली.

मुंबई : मान्सूनने अद्यापही मुंबईसह राज्यात हजेरी लावली नसली, तरी शनिवारी सकाळीच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. विशेष म्हणजे, शनिवारी सकाळी पावसाची रिमझिम सुरू होताच, महापालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. प्रत्यक्षात मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरात कुर्ला पश्चिम व अंधेरी पूर्व येथे तुंबलेल्या पावसाच्या पाण्याने रहिवाशांना त्रास झाल्याने वॉचडॉग फाउंडेशनने महापालिकेवर सडकून टीका करत, हा तर फक्त ‘टे्रलर’ असल्याचे म्हटले आहे.मुंबई शहर आणि उपनगरात थोडासा मुसळधार पाऊस पडला, तरी ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना काही नव्या नाहीत. मात्र, यंदा मान्सूनपूर्व कामांची जय्यत तयारी करण्यात आल्याने पावसाचे पाणी साचणार नाही; असा दावा महापालिकेने केला आहे. शनिवारी सकाळी जेव्हा पावसाने सुरुवात केली, तेव्हा महापालिकेने हिंदमाता आणि वांद्रे येथील सखल ठिकाणी कर्मचारी तैनात करत पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, लोकलसेवा आणि रस्ते वाहतूक काहीशी कोलमडल्याने महापालिकेवर टीकेची झोड उठली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अंधेरी पूर्वेकडील सेव्हन हिल्स रुग्णालय परिसर, मरोळसह लगतच्या परिसरात आणि वांद्रे येथील झोपड्यांच्या वस्तीत पाणी साचले, शिवाय कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार आणि लगतच्या चाळींमध्येही छोटी गटारे तुडुंब भरल्याचे निदर्शानास आले. मुळात येथील छोटी आणि मोठी गटारे साफ करण्यात आली नसल्याने पाणी साचल्याच्या घटना घडल्या, असे स्थानिकांनी सांगितले. साहजिकच, येथील छोटी गटारे मोठ्या गटारांना जोडण्यात आली आहेत. मोठ्या गटारांतील कचरा काढण्यात आलेला नाही आणि ही मोठी गटारे लगतच्या मिठी नदीत सोडण्यात आली आहेत. दुसरीकडे मिठीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह आहे. किंचितशा पावसाने घर-गल्ल्यांसह सखल चाळीत पाणी साचल्याने मोठा पाऊस झाल्यावर काय होईल? असा सवालही मरोळ आणि कुर्ला येथील रहिवाशांनी केला आहे.मुंबईतील नागरी समस्यांचा अभ्यास असणारे वॉचडॉग फाउंडेशनचे संचालक गॉडफ्रे पिमेंटा यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुळात पालिका साफसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना धारेवर धरत नाही. आयुक्त असोत वा प्रशासन स्तरावरील अधिकारी, संबंधितांनी कंत्राटदारांना लगाम घातल्याशिवाय पावसाळ्यातील कामे मार्गी लागणारच नाहीत. दरवर्षी जसा पावसाळा येतो, तसे दरवर्षी पालिका साफसफाईची कामे हाती घेते. मात्र, पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. किमान या वर्षी तरी आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना फैलावर घेतले, तर मान्सून दाखल होत असतानाच, ज्या ठिकाणची नालेसफाईची अथवा पावसाळापूर्व कामे शिल्लक आहेत, ती पूर्ण होण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. (प्रतिनिधी)