शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

जुन्नरवासीयांनाही हवे नवे विमानतळ

By admin | Updated: November 3, 2016 01:22 IST

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा, यासाठी ग्रामपंचायतचा ठराव करून पाठविला होता. त्यानंतर या ठरावास आणे, नळावणे आणि पेमदरा या ग्रामपंचायतींनीही अनुकूलता दाखविली असून, तसा ठराव या ग्रामपंचायतींनीही केला आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.मागील सात वर्षांपासून पुणे विमानतळ मंजूर होऊनदेखील जागेअभावी वारंवार जागा बदलूनदेखील स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रत्यक्ष विमानतळासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. चाकण, खेड आणि आता पुरंदर या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रस्ताव आहे. परंतु बागायती क्षेत्र तसेच जमिनीचे भाव या कारणांमुळे स्थानिक शेतकरी जमीन देण्यास विरोध करीत आहेत. वरील कारणांचा विचार केला असता, पुण्यापासून १०० कि.मी.अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागावरील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावांना लाभलेल्या सुमारे नऊ हजार हेक्टर सलग व समतल जमीन विमानतळासाठी विचाराधीन घेतला जाऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांना वाटते. या भागाची भौगोलिक स्थिती पर्जन्यमान, शेती, दळणवळण या गोष्टींचा विचार केला असता, विमानतळासाठी या ठिकाणी सलग जमीन उपलब्ध होऊ शकते.पर्जन्यमान कमी असल्याकारणाने हजारो एकर पठार भाग पडीक असून, लागवडीखालील क्षेत्रातही पावसाळी पिके घेतली जातात. दळणवळणाच्या दृष्टीने विचार केला असता, पुणे, नाशिक, संगमनेर, मुंबई, अहमदनगर ही सर्व शहरे १०० ते १५० कि.मी.च्या अंतरावर असून, पुणे, नाशिक आणि कल्याण-नगर महामार्ग याच भागातून गेले आहेत. भविष्यात या दोन्हीही महामार्गावर रेल्वेलाइनसुद्धा प्रस्तावित आहे. शेतमाल निर्यातीच्या दृष्टीने विचार केला असता, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव, पारनेर, संगमनेर या भागात आधुनिक शेती केली जाते. पुणे विमानतळ हा प्रवासी वाहतूक त्याचबरोबर शेतमाल आणि औद्योगिक माल निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, जुन्नरच्या पूर्व पठार भागात असलेली जागा या सर्व बाबींचा विचार केला असता, योग्य असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे विमानतळ या भागात झाल्यास स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा विमानतळ होण्यास विरोध असणार नाही. या प्रस्तावाचा शासनाने लवकरात लवकर विचार करून सर्व्हे करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार व आमदार यांना पाठविण्यात आल्या असून, शासन आता यावर काय निर्णय घेते, याची उत्सुकता येथील ग्रामस्थांना लागली आहे.