शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरवासीयांनाही हवे नवे विमानतळ

By admin | Updated: November 3, 2016 01:22 IST

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा

बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी गावाने पठार भागात विमानतळ व्हावा, यासाठी ग्रामपंचायतचा ठराव करून पाठविला होता. त्यानंतर या ठरावास आणे, नळावणे आणि पेमदरा या ग्रामपंचायतींनीही अनुकूलता दाखविली असून, तसा ठराव या ग्रामपंचायतींनीही केला आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.मागील सात वर्षांपासून पुणे विमानतळ मंजूर होऊनदेखील जागेअभावी वारंवार जागा बदलूनदेखील स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रत्यक्ष विमानतळासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. चाकण, खेड आणि आता पुरंदर या ठिकाणी नियोजित विमानतळाचा प्रस्ताव आहे. परंतु बागायती क्षेत्र तसेच जमिनीचे भाव या कारणांमुळे स्थानिक शेतकरी जमीन देण्यास विरोध करीत आहेत. वरील कारणांचा विचार केला असता, पुण्यापासून १०० कि.मी.अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागावरील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावांना लाभलेल्या सुमारे नऊ हजार हेक्टर सलग व समतल जमीन विमानतळासाठी विचाराधीन घेतला जाऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांना वाटते. या भागाची भौगोलिक स्थिती पर्जन्यमान, शेती, दळणवळण या गोष्टींचा विचार केला असता, विमानतळासाठी या ठिकाणी सलग जमीन उपलब्ध होऊ शकते.पर्जन्यमान कमी असल्याकारणाने हजारो एकर पठार भाग पडीक असून, लागवडीखालील क्षेत्रातही पावसाळी पिके घेतली जातात. दळणवळणाच्या दृष्टीने विचार केला असता, पुणे, नाशिक, संगमनेर, मुंबई, अहमदनगर ही सर्व शहरे १०० ते १५० कि.मी.च्या अंतरावर असून, पुणे, नाशिक आणि कल्याण-नगर महामार्ग याच भागातून गेले आहेत. भविष्यात या दोन्हीही महामार्गावर रेल्वेलाइनसुद्धा प्रस्तावित आहे. शेतमाल निर्यातीच्या दृष्टीने विचार केला असता, जुन्नर, खेड, शिरूर, आंबेगाव, पारनेर, संगमनेर या भागात आधुनिक शेती केली जाते. पुणे विमानतळ हा प्रवासी वाहतूक त्याचबरोबर शेतमाल आणि औद्योगिक माल निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, जुन्नरच्या पूर्व पठार भागात असलेली जागा या सर्व बाबींचा विचार केला असता, योग्य असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे विमानतळ या भागात झाल्यास स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा विमानतळ होण्यास विरोध असणार नाही. या प्रस्तावाचा शासनाने लवकरात लवकर विचार करून सर्व्हे करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार व आमदार यांना पाठविण्यात आल्या असून, शासन आता यावर काय निर्णय घेते, याची उत्सुकता येथील ग्रामस्थांना लागली आहे.