शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भाईंदरमधील जोशी रुग्णालयाचा भार 3 डॉक्टरांवरच, कर्तव्य बजावणारे डॉक्टर संपाच्या पावित्र्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:26 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राजू काळे/भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ तीनच डॉक्टरांवर सोपवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डॉक्टरांच्या संख्येत तातडीने वाढ करण्याची मागणी या डॉक्टरांकडून प्रशासनाकडे सतत करण्यात येत आहे. यावर त्वरित कार्यवाही न केल्यास ते डॉक्टर आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे वैद्यकीय विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  

सुमारे 200 खाटांचे हे रुग्णालय 10 जानेवारीला रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा देण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे रुग्णालय तूर्तास 100 खाटांच्या क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सुरुवातीपासूनच तोकड्या वैद्यकीय सोईसुविधायुक्त ठरू लागले आहे. खासगी रुग्णसेवेत बक्कळ पैसा कमावणारे डॉक्टर कमी पगारात पालिकेच्या रुग्णालयात नियुक्त होण्यास उत्सुक नसल्यानेच डॉक्टरांची वानवा असल्याचा दावा प्रशासनाकडून सतत केला जात आहे. 

यामुळे अनेकदा जाहिरातीच्या माध्यमातून डॉक्टर नियुक्तीचा प्रयत्न प्रशासनाने करुनही डॉक्टरांची पुरेशी संख्या अद्याप तोकडीच राहिलेली आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असून एका वैद्यकीय अधिका-याला अनेकदा 24 तासांची रुग्णसेवा नाईलाजास्तव द्यावी लागत आहे. या रुग्णालयात काही स्थानिक खासगी डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभागात मोफत सेवा देण्याला सुरुवात केली आहे. रुग्णालयात सध्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभाग, पुरुष व स्त्री वैद्यकीय विभाग, कुपोषित बालक उपचार कक्ष (पोषण पुर्नवसन केंद्र), सोनोग्राफी, अपघात विभाग सुरू आहेत. यात वैद्यकीय अधिका-यांसह काही विशेषज्ज्ञांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली असून प्रत्येकी 1 पॅथोलॉजिस्ट, मनोविकारतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, त्वचारोगतज्ज्ञ, (नाक, तोंड, घसा) ईएनटी विकार तज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश आहे. हे विशेषज्ज्ञसुद्धा बाह्यरुग्ण विभागात सेवा देऊन दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची आवश्यकतेनुसार तपासणी करतात. परंतु, संध्याकाळी ४ ते सकाळी ९ वाजेदरम्यान महत्त्वाच्या वेळेत मात्र केवळ चार डॉक्टरांवर ५० रुग्णांचा भार सोपवण्यात आला आहे. 

यातील एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अलिकडेच रुग्ण दगावल्याची घटना घडल्याने त्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. यामुळे सध्या तीनच डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार टाकण्यात आला आहे. प्रत्यक्षात अस्तित्वातील रुग्णांच्या संख्येनुसार रुग्णालयात १२ डॉक्टरांची आवश्यकता आहे. यावरुन कर्तव्य बजावणा-या तीन डॉक्टरांच्या सहकार्यासाठी आणखी 8 डॉक्टरांची नियुक्ती प्रशासनाकडून होणे अपेक्षित असताना अद्याप पुरेशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे कंटाळलेल्या एका स्त्रीरोगतज्ज्ञाने अलिकडेच राजीनामा दिला आहे. या अपु-या संख्येतच त्या तीन वैद्यकीय अधिका-यांना शवविच्छेदन केंद्रातही सेवा द्यावी लागत असल्याने ते अधिकारी पुरते हैरान झाले आहेत. प्रशासनाने त्वरीत पुरेशा वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या केली जात आहे. 

डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरूपालिकेने पुरेशा डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली असुन त्याच्या जाहिरातीचा मसुदा तयार करण्यात येत आहे. लवकरच थेट मुलाखतीतून निवड झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती जोशी रुग्णालयात केली जाणार आहे. -डॉ. प्रकाश जाधव, पालिका वैद्यकीय विभागाचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी