शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द : दोन्ही हात नसतांनाही करतो टेलरींगचा व्यवसाय

By admin | Updated: September 11, 2016 19:58 IST

अपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने आपल्या कर्तव्यातून समाजासमोर जिद्द आणी चिकाटीचा नवीन आदर्श ठेवला आहे.

नाना हिवराळेखामगाव (जि.बुलडाणा) - आयुष्यामध्ये नैराश्य, संकटे आली की, माणुस आत्महत्येचा पर्याय शोधतो स्वत:च्या पराभवाची हार माणुन दुसऱ्यावर खापर फोडणारे अनेक जण दिसुन येतात. मात्र अपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने आपल्या कर्तव्यातून समाजासमोर जिद्द आणी चिकाटीचा नवीन आदर्श ठेवला आहे. त्याची ही कृती समाजातील प्रत्येकाला दिशा देणारी ठरणार आहे.

शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथील शत्रुघ्न शामराव देठे (वय ४२) यांची यशोगाथा धडधाकट्यांना प्रेरीत करणारी आहे. शेतकरी कुटंबांत जन्मलेल्या शत्रुघ्नने बारावीचे शिक्षण संपल्यानंतर टेलरींग शिकण्याला सुरुवात केली नांदुरा येथे टेलरींग शिकण्यासाठी दररोज येणे जाणे सुरु होते. १९९८ मध्ये शेगाव येथुन नांदुरा येथे रेल्वे ने जात असतांना अळसणा गावाजवळ शत्रुघ्न रेल्वेमधुन पडला या अपघातात त्याला दोन्ही हात गमवावे लागले. आयुष्याची जिवनाची सुरुवात होत असतांनास हाताचे मनगट तुटुन पडल्याने शत्रुघ्नला जिवनाची संध्याकाळ दिसत होती.

आई वडील शेतीत काम करुन प्रसंगी शेतमजूरी करून कुटुंबांचा गाडा चालवीतात. त्यांनाच जिवनाचा भार सोसावा लागणार या काळजीने शत्रुघ्न स्वत:लाच पाहत होता. मात्र अशाही परिस्थीतीत नैराश्यने खचुन न जाता शत्रुघ्नने आपला टेलरींगचा व्यवसायच आपला तारणहार असल्याचे समजून या व्यवसायाकडे वळला. त्यांच्यातील कला पुन्हा जिवंत करुन शत्रुघ्नने शक्कल लढवून कात्री हातात घेतली सुरुवातीला सर्वांनीच त्याच्या या कामाला वेड्यात काढले. परंतू तरीही हार न मानता त्याने टेलरींगचा व्यवसाय सुरु केला. दोन्ही हात नसतांना पायात कात्री घेवून कपडे कापणे, कपडे शिवणे तसेच वरलॉक मशीन चालवून शत्रुघ्न कपडे बनवीत आहे. त्याचे लग्न झाले असून त्यांना चार मुली आहेत. पत्नी सिंधुताई दिवसभर शेतात काम करुन सायंकाळी घरी आ ल्यावर पतीला या कामात मदत करते. तिच्या सहकार्यानेच शत्रुघ्न या आयुष्याच्या वळणावर झेप घेत आहे. सुईत धागा वळला अन शत्रुघ्नचे लग्न ठरले.दोन्ही हातांना अपंग असलेल्या शत्रुघ्नला लग्नासाठी मुलगी मिळणार की नाही याची साशंकता होती. मात्र नातेवाईकांनी मुलगा अपंग असतांनाही होतकरु आहे. या बळावर मुली पाहणे सुरु केले. शेवटी नांदुरा तालुक्यातील कोळंबा येथे मुलगी पाहण्यासाठी गेले असता मुलीकडच्या मंडळींनी मुलाला सुईत धागा वळुन दाखावा अशी अट घातली. यावेळी शत्रुघ्न केवळ सुईत धागा टाकुन नव्हे तर चक्क कपडे शिवुन दाखवले. यामुळे मुलीकडील पाहुणे थक्क झाले व येथेच लग्न जुळले.१८ वर्षापासून रामनामाचा जपअपघातानंतर दोन्ही हात गमावलेल्या शत्रुघ्नने जिवनाची दिशा ठरवली. त्याची दिनचर्या सामान्यांना लाजवीणारी आहे. पहाटे साडे तीन वाजता पासून शत्रुघ्नची दिनचर्या सुरु होते. पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत गावातीलच हनुमान मंदीरात दररोज नित्य नियमाने रामनामाचा जप शत्रुघ्न करीत आहे. त्याने आता पर्यत ४६ रजीष्टर मध्ये राम नामाचे अक्षर लिहून भक्ती भाव दाखवीला आहे.जिवनात कितीही कठीण परिस्थीती आली तरीही माणसाने खचुन न जाता धैर्याने आलेल्या संकटाचा सामना करावा. परिस्थीतीला सामोरे जाता माणूस जिवनात नक्कीच यशस्वी होतो. माझा आजच्या तरुण पिढीला हाच संदेश आहे. - शत्रुघ्न देठे,डोलारखेड ता. शेगाव