शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजू शेट्टी यांना न घेता उडालं जेट एअरवेजचं विमान

By admin | Updated: June 14, 2017 13:49 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना जेट एअरवेज या विमान कंपनीच्या हलगर्जीपणाला सामोरं जावं लागलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - विमान प्रवास करताना राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याप्रमाणेच खासदार राजू शेट्टी यांचा विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद झाला. आज मुंबई ते दिल्ली असा प्रवास राजू शेट्टी यांना करायचा होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. विमानातून प्रवास करताना राजू शेट्टी यांच्याकडे बोर्डिंग पास असूनही त्यांना विमानातून प्रवास करताच आला नाही. 
 
खासदार राजू शेट्टी बुधवारी सकाळी  6 वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. तसंच विमानाच्या एक तास आधीच ते विमानतळावरसुद्धा हजर होते. रितसर बोर्डिंग पास घेऊन ते वेळेच्या आधी लॉन्जमध्ये बसले आणि रजिस्टरमध्ये नोंद केली होती. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह कोणीही मदतनीस नव्हता. काही वेळानंतर राजू शेट्टी बोर्डिंग करण्यासाठी लॉन्जच्या बाहेर आल्यावर त्यांना बोर्डिंग द्वार बंद झाल्याचं कळविण्यात आलं.राजू शेट्टी यांनी दिल्लीला एका महत्त्वाच्या बैठकीला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर राजू शेट्टी यांना सात वाजताच्या विमानाचं बदली तिकीट दिलं पण त्यासाठी दोन हजार रूपये जेटने घेतले. आपली चूक नसल्याने याबाबत पैसे भरण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला पण जेटने त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेरीस त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मागितली. पण जेटकडून पावती न मिळाल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  याप्रकऱणी एअरपोर्ट अथॉरीटीकडे तक्रार करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पण या प्रकऱणी जेट एअरवेजने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
याआधी एअर इंडियाने योग्य वागणूक न दिल्याने शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा क्रु मेंबर्ससह वाद झाला होता. यावादात रविंद्र गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचीही घटना घडली. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पर्सनल सिक्युरिटीसह एअर इंडियाने प्रवास नाकारला होता त्यावर राज ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.