शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

राजू शेट्टी यांना न घेता उडालं जेट एअरवेजचं विमान

By admin | Updated: June 14, 2017 13:49 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना जेट एअरवेज या विमान कंपनीच्या हलगर्जीपणाला सामोरं जावं लागलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - विमान प्रवास करताना राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये वादाच्या घटना वाढू लागल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याप्रमाणेच खासदार राजू शेट्टी यांचा विमानतळावर जेट एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद झाला. आज मुंबई ते दिल्ली असा प्रवास राजू शेट्टी यांना करायचा होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. विमानातून प्रवास करताना राजू शेट्टी यांच्याकडे बोर्डिंग पास असूनही त्यांना विमानातून प्रवास करताच आला नाही. 
 
खासदार राजू शेट्टी बुधवारी सकाळी  6 वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. त्यासाठी त्यांनी बिझनेस क्लासचं तिकीट काढलं होतं. तसंच विमानाच्या एक तास आधीच ते विमानतळावरसुद्धा हजर होते. रितसर बोर्डिंग पास घेऊन ते वेळेच्या आधी लॉन्जमध्ये बसले आणि रजिस्टरमध्ये नोंद केली होती. यावेळी राजू शेट्टी यांच्यासह कोणीही मदतनीस नव्हता. काही वेळानंतर राजू शेट्टी बोर्डिंग करण्यासाठी लॉन्जच्या बाहेर आल्यावर त्यांना बोर्डिंग द्वार बंद झाल्याचं कळविण्यात आलं.राजू शेट्टी यांनी दिल्लीला एका महत्त्वाच्या बैठकीला जायचं होतं. त्यामुळे त्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर राजू शेट्टी यांना सात वाजताच्या विमानाचं बदली तिकीट दिलं पण त्यासाठी दोन हजार रूपये जेटने घेतले. आपली चूक नसल्याने याबाबत पैसे भरण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला पण जेटने त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेरीस त्यांनी पैसे भरले पण त्याची पावती मागितली. पण जेटकडून पावती न मिळाल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  याप्रकऱणी एअरपोर्ट अथॉरीटीकडे तक्रार करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. पण या प्रकऱणी जेट एअरवेजने अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
याआधी एअर इंडियाने योग्य वागणूक न दिल्याने शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांचा क्रु मेंबर्ससह वाद झाला होता. यावादात रविंद्र गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारल्याचीही घटना घडली. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पर्सनल सिक्युरिटीसह एअर इंडियाने प्रवास नाकारला होता त्यावर राज ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती.