शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

मागेल त्याला शेततळे नव्हेत,जमेल त्याला शेततळे : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:04 IST

भाजप सरकार फसवे आहे. 'मागेल त्याला शेततळे' अशी घोषणाबाजी करून सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे.

मुंबई - मागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांला अर्ज करून ही शेततळाच्या लाभ मिळत नसेल तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या योजनेचे नाव बदलून 'जमेल त्याला शेततळे' असे केले पाहिजे असल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या ठराववर ते बोलत होते.

भाजप सरकार फसवे आहे. 'मागेल त्याला शेततळे' अशी घोषणाबाजी करून सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने दावा केला आहे की, ६२ हजार शेततळे बनवली गेली आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख ८२ हजार अर्ज सरकारकडे आलेली आहेत. त्यातील लाखभर शेतकऱ्यांना सुद्धा शेततळी मिळाली नसतील तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.

भाजप सरकारच्या शेततळे योजनेचे नाव , 'मागले त्याला शेततळे' एवजी 'जमेल त्याला शेततळे' किंवा 'आमच असेल त्याला शेततळे' ठेवले पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेतून शेततळे होत नाही. त्यामुळे ५० हजार रुपये वाढवून देण्याची मागणी केली असताना सरकारने त्याकडे दुर्लक्षित केले असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

यावेळी त्यांनी, राज्यपालांचे अभिभाषण मान्य नसून त्याला आम्ही विरोध करत असल्याचे म्हणाले. गेल्या पाचवर्षातील राज्यपालांचे भाषण म्हणजे सरकारच इरादापत्र असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. आम्ही काय करणार या पेक्षा, आम्ही काय केलं असे राज्यपाल यावेळी आपल्या भाषणातून सांगतील अशी अपेक्षा होती. पण यावेळी देखील तिचं टिमकी वाजवली असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला.