शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जायकवाडीला गरजेपुरतेच पाणी

By admin | Updated: September 24, 2016 06:36 IST

पाणी राष्ट्रीय संपत्ती असल्याने कोणताही नागरिक, संस्था किंवा कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही.

मुंबई : पाणी राष्ट्रीय संपत्ती असल्याने कोणताही नागरिक, संस्था किंवा कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दुष्काळ असेल तेव्हा गरजेपुरतेच पाणी सोडावे, असा निर्णय शुक्रवारी दिला.दुष्काळाला तोंड देण्यासाठी चार महिन्यांत पाणीवाटप योजना तयार करण्याचा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने नाशिक-नगरच्या मुळा, प्रवरा, गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला नाशिक-नगरकरांनी विरोध करत समन्यायी वाटपाची तरतूद असलेल्या महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरण कायद्यातील कलमाच्या (सी) वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर मराठवाडा जनता विकास परिषद व अन्य काहींनी राज्य सरकारला २००५च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे झाली....मग नद्यांचे पाणी वळवण्यास अनास्था का?सह्याद्री घाटातील नद्यांचे पाणी गोदावरी व तापी नद्यांमध्ये वळते करण्याबाबत राज्य सरकारने २००१मध्ये निर्णय घेतला. मात्र फार मोठी आर्थिक तरतूद करावी लागेल, म्हणून हा प्रस्ताव बारगळला. मात्र हेच सरकार अरबी समुद्रात स्मारक बांधण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे, असे न्यायालयाने सांगतिले. नाशिक-नगरच्या धरणांतील पाणी पाइपलाइनने जायकवाडीत सोडण्यात यावे. तंत्रज्ञानाच्या जिवावर हे शक्य आहे, असे न्यायालय म्हणाले.या आदेशांची पूर्तता करण्यात आली की नाही, हे पाहण्यासाठी याचिकांवरील पुढील सुनावणी १० जानेवारी २०१७ला ठेवली आहे.>सिंचनाच्या योजना तातडीने पूर्ण कराराज्य सरकारने ६ सप्टेंबर २००४ रोजी नाशिकमध्ये कोणत्याही सिंचन प्रकल्पास मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तथापि, यापूर्वी मंजूर केलेल्या २३ योजनांची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचा आदेश सरकारला दिला. जल राष्ट्रीय संपत्ती नाशिक-नगरकरांनी कायद्याच्या कलमाला (सी) दिलेले आव्हान फेटाळून लावत उच्च न्यायालयाने म्हटले की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. भौगोलिक रचनेनुसार एखादा नागरिक, संस्था किंवा एखादी कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. पाणीवाटपाचे सर्वाधिकार राज्य सरकारला आहेत. >सरकारचे कान टोचलेभविष्यात पाणीवाटपावरून वाद निर्माण होऊ नयेत. पाणीवाटपाचे चार महिन्यांत धोरण आखा.दरवेळी गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी व अन्य पाण्याच्या साठ्यांचा आढावा घेण्याबाबत सहा महिन्यांत धोरण आखा.कायद्यातील तरतुदीनुसार, पाणीवापर संघटना गठीत करा.