शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

जायकवाडीला गरजेपुरतेच पाणी

By admin | Updated: September 24, 2016 06:36 IST

पाणी राष्ट्रीय संपत्ती असल्याने कोणताही नागरिक, संस्था किंवा कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही.

मुंबई : पाणी राष्ट्रीय संपत्ती असल्याने कोणताही नागरिक, संस्था किंवा कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने मराठवाड्यातील जायकवाडी धरणात दुष्काळ असेल तेव्हा गरजेपुरतेच पाणी सोडावे, असा निर्णय शुक्रवारी दिला.दुष्काळाला तोंड देण्यासाठी चार महिन्यांत पाणीवाटप योजना तयार करण्याचा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास प्राधिकरणाने नाशिक-नगरच्या मुळा, प्रवरा, गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला नाशिक-नगरकरांनी विरोध करत समन्यायी वाटपाची तरतूद असलेल्या महाराष्ट्र जलसंपदा प्राधिकरण कायद्यातील कलमाच्या (सी) वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर मराठवाडा जनता विकास परिषद व अन्य काहींनी राज्य सरकारला २००५च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे झाली....मग नद्यांचे पाणी वळवण्यास अनास्था का?सह्याद्री घाटातील नद्यांचे पाणी गोदावरी व तापी नद्यांमध्ये वळते करण्याबाबत राज्य सरकारने २००१मध्ये निर्णय घेतला. मात्र फार मोठी आर्थिक तरतूद करावी लागेल, म्हणून हा प्रस्ताव बारगळला. मात्र हेच सरकार अरबी समुद्रात स्मारक बांधण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे, असे न्यायालयाने सांगतिले. नाशिक-नगरच्या धरणांतील पाणी पाइपलाइनने जायकवाडीत सोडण्यात यावे. तंत्रज्ञानाच्या जिवावर हे शक्य आहे, असे न्यायालय म्हणाले.या आदेशांची पूर्तता करण्यात आली की नाही, हे पाहण्यासाठी याचिकांवरील पुढील सुनावणी १० जानेवारी २०१७ला ठेवली आहे.>सिंचनाच्या योजना तातडीने पूर्ण कराराज्य सरकारने ६ सप्टेंबर २००४ रोजी नाशिकमध्ये कोणत्याही सिंचन प्रकल्पास मंजुरी न देण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तथापि, यापूर्वी मंजूर केलेल्या २३ योजनांची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचा आदेश सरकारला दिला. जल राष्ट्रीय संपत्ती नाशिक-नगरकरांनी कायद्याच्या कलमाला (सी) दिलेले आव्हान फेटाळून लावत उच्च न्यायालयाने म्हटले की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. भौगोलिक रचनेनुसार एखादा नागरिक, संस्था किंवा एखादी कंपनी विशिष्ट प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी दावा करू शकत नाही. पाणीवाटपाचे सर्वाधिकार राज्य सरकारला आहेत. >सरकारचे कान टोचलेभविष्यात पाणीवाटपावरून वाद निर्माण होऊ नयेत. पाणीवाटपाचे चार महिन्यांत धोरण आखा.दरवेळी गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी व अन्य पाण्याच्या साठ्यांचा आढावा घेण्याबाबत सहा महिन्यांत धोरण आखा.कायद्यातील तरतुदीनुसार, पाणीवापर संघटना गठीत करा.