शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जपानी पिकांची होणार महाराष्ट्राच्या मातीत लागवड; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 14:47 IST

जपानी कृषितंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी बारामतीत बैठक

बारामती : दिवसेंदिवस बदलणाऱ्या  हवामानामुळे देशातील पिके,पिकांना मिळणाऱ्या बाजारपेठेवर विपरीत परीणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक क्षमता अधिक असणाऱ्या ,कमी पाण्यावर उगवणाऱ्या द्राक्ष,ऊस,संत्रा सारख्या जपानी पिकांची महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी पहिले पाऊल पडले आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकारातुन जपानच्या कृषितज्ञांसमवेत बारामतीत आज याबाबत पहिली बैठक पार पडली. येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट लवकरच त्यासाठी कृषि आराखडा तयार करणार आहे.त्यामुळे आपल्या मातीत जपानी कृषि आणि यांत्रिकीकरणाचे संशोधन रुजण्याचे संकेत आहेत. येथील कृषि विज्ञान केंद्रात पवार यांच्यासह द्राक्ष बागायतदारसंघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह,काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमवेत जपानचे मिशीहो  हाराडा यांची बुधवारी(दि ११) बैठक पारपडली.  यावेळी कृषी विज्ञान केंद्रात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारीनिलेश नलावडे,प्रमुख शास्त्रज्ञ डॉ रतन जाधव,सल्लागार डॉ. संतोष भोसले, विवेक भोईटे ,डॉ मिलींद जोशी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरुन मिशीहो बारामतीत आले होते. सकाळी त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला भेट देत येथील कृृषि संशोधनासह प्रयोगाची  पाहणी केली. त्या नंतर पार पडलेल्या बैठकीत महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मिशिहो म्हणाले, जपानमधील ओसाका ते हिरोशीमा या पट्ट्यात द्राक्षाची उत्तम शेती केलीजाते. जपानमध्ये द्राक्षाला भावही चांगला मिळतो. शरद पवार यांच्याशी पुर्वी झालेल्या भेटीत त्यांना  ही बाब सांगितली.यावेळी पवार यांनीदिलेल्या आमंत्रणावरुन आज येथे भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.या शिवाय कृषी क्षेत्रात जपान सरकारच्या मदतीने काही स्टार्ट अप सुरु करण्याबाबतची चर्चा बैठकीत करण्यात आली.

जपानमध्ये  द्राक्षासह संत्रा,मोसंबी,ऊस या पिकांची लागवड होते. ही पिके रोगाला कमी प्रमाणात बळी पडणारी आहेत.कमी पाण्यावर अधिक दर्जेदार उत्पादन देण्यासाठी जपानी कृषि तंत्रज्ञान नावाजलेले आहे.शिवाय जपान संपुर्ण जगात तंत्रज्ञानासाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे जपानच्या कृषी आणि यांत्रिकीकरणाचे तंत्रज्ञान महाराष्ट्राच्या मातीत रुजविण्याबाबत एैतिहासिक चर्चा यावेळी झाली.येथील कृषि विज्ञान केंद्रात इस्त्राईल,नेदरलँडच्या प्रगत संशोधनाचा अवलंब करण्यात यशस्वी प्रयोग झाले आहेत.आता जपानी तंत्रज्ञानाचा यशस्वी अवलंब करण्यास महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.

विषमुक्त पिकांची संकल्पना रूजण्यास ‘साहेबांचा’ पुढाकार

भारतात द्राक्षावर भुरी,डावण्यासारखे रोग पडतात.त्यासाठी द्राक्षबागांवर मोठी औषध फवारणी होते. मात्र, जपान १९६० पासुन सेंद्रीय शेती करतो.तिथे औषध फवारणी केली जात नाही.जपानमध्ये मस्कत ही उत्तम प्रतीची द्राक्ष मानली जातात.या द्राक्षाला जपानमध्ये कमाल पाच हजार प्रति किलो दर मिळतो. अगदी तिसऱ्या ग्रेडच्या द्राक्षाला देखील ३ हजारापेक्षा अधिक दर मिळतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मातीत विषमुक्त द्राक्षासह विविध रसायनमुक्त पिकांची संकल्पना रुजण्यास मोठी मदत मिळणार आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा त्यासाठी घेतलेला पुढाकार भारतीय कृषिक्षेत्राला दिशा देणारा ठरणार असल्याचे संकेत आहेत. बारामती इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे प्रमाण अधिक आहे. जपानी द्राक्ष या मातीत रुजल्यास येथील शेतीप्रयोग जगभरात प्रसिध्द होतील.————

टॅग्स :BaramatiबारामतीagricultureशेतीSharad Pawarशरद पवार