शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

जालन्यात विराट मराठा मोर्चा!

By admin | Updated: September 19, 2016 20:16 IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांसाठी शहरात सोमवारी काढण्यात आलेल्या विराट मराठा क्रांती मूकमोर्चातील नि:शब्द हुंकाराने तमाम जालनेकरांना स्तब्ध केले

ऑनलाइन लोकमतजालना, दि. १९ : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व अन्य मागण्यांसाठी शहरात सोमवारी काढण्यात आलेल्या विराट मराठा क्रांती मूकमोर्चातील नि:शब्द हुंकाराने तमाम जालनेकरांना स्तब्ध केले. मोर्चात मुली आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मूकमोर्चाने यापूर्वीचे जिल्ह्यातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. विशेष म्हणजे मोर्चेकरी महिलांची रांग ही ७ कि़ मी. पर्यंत होती. शिस्तबद्ध काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने मराठा एकीचे दर्शन झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ व आरक्षण, अ‍ॅट्रासिटी कायद्यातील बदल, स्वामीनाथन आयोग लागू करणे, चित्रपट व नाटकांतून समाजाची बदनामी थांबविणे आदी मागण्यांसाठी सोमवारी सकाळी ८ वाजताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून समाजबांधव शिवाजीपुतळा परिसरात जमा होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११.४५ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास एका मुलीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चास सुरुवातीला मुली, युवती त्यानंतर महिलांचा सहभाग होता. शिवाजी पुतळा, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मंमादेवी, मस्तगड, गांधीचमन, कचेरी रोड, शनीमंदीर, उड्डाणपूल मार्गे मोर्चा अंबड चौफुलीवर पोहोचला. तेव्हा मोर्चातील शेवटची महिला ही शिवाजी पुतळा परिसरात होती. ७ किलोमीटर अंतरापर्यंत मुली आणि महिलांची रांग होती.

त्यानंतर डॉक्टर्स, वकील, शिक्षक, अभियंता, युवक, मुले, व्यापारी, ज्येष्ठ समाजबांधव व मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठीतांचा सहभाग होता. तर मंठा रोडवर १० कि़मी. पर्यंत मोर्चेकऱ्यांची वाहने थांबून होती. शहरातील क्रीडासंकुल, आझादमैदान, मातोश्री लॉन्स, भक्त कॉलेज आदी भागांत वाहनांच्या पार्कींगसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मोर्चामार्गावर ध्वनीक्षेपनाची व्यवस्था करण्यात आल्याने संयोजकांकडून मार्गदर्शन केले जात होते. मोर्चा अंबड चौफुलीवर पोहोचल्यानंतर मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर समाजबांधव थांबले होते.

अनेकांना अंबड चौफुलीपर्यंत पोहोचता आले नाही. प्रचंड गर्दीमुळे मोर्चाचा समारोप झाल्यानंतर त्यांना तेथूनच परतावे लागले. अंबड चौफुलीवर मोर्चा पोहोचल्यानंतर प्रारंभ नऊ मुलींनी जिजाऊ वंदना गायली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एका मुलीने समाजबांधवांसमोर निवेदनाचे वाचन केले. याप्रसंगी कोपर्डी येथील पिडीत मुलीसह काश्मीरमधील उरी येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने मोर्चा समारोप झाल्याचे जाहीर करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध काढण्यात आलेल्या मूक मोर्चाने जिल्ह्यातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असून, जिल्ह्यात ‘न भूतो न भविष्यती’ असाच हा मोर्चा ठरला आहे. मोर्चात जवळपास २० लाख समाजबांधव सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. मोर्चात जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून समाजबांधव सहभागी झाले होते.