शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा दुष्काळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 17:04 IST

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५०१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केले.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. २९ -  यंदा झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १५०१ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केले. त्यामुळे जिल्हा दुष्काळमुक्त झाल्याचे या पैसेवारीने शिक्कामोर्तब झाले आहे. २०१६-१७ ची सुधारीत पैसेवारी जिल्हा प्रशासनाने २९ आॅक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. त्यात जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत आलेली नाही.

सर्व गावे ५० पैशांच्यावर आहे. म्हणजे जिल्ह्यात चांगला हंगाम असल्याचे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील मंडळातील पीक कापणी अहवाल कसा आहे, याची माहिती घेण्यात आली. हा अहवाल तहसीलदारांना सादर केल्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी व कृषी अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात आली. त्यानंतर एकत्रित अहवाल तयार करण्यात आला.

यात जळगाव : ९२, जामनेर १५२, एरंडोल : ६५, धरणगाव : ८९, भुसावळ : ५४, यावल : ८४, रावेर : १२१, मुक्ताईनगर : ८१, बोदवड : ५१, पाचोरा : १२८, चाळीसगाव: १३६, भडगाव : ६३, अमळनेर : १५४, पारोळा : ११४, चोपडा तालुक्यातील ११७ अशा १५०१ गावांची सुधारीत पैसेवारी ही ५० पैशांच्यावर आली आहे. आता १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी १२९५ गावांची पैसेवारी होती ५० पैशांच्या आत गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील १५०१ गावांपैकी तब्बल १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत होती.

त्यानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थिती चांगली आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये शासनातर्फे कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात आली होती. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय झाला होता. मात्र लाभ मिळाला नव्हता.