शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जैन धर्मीयांचे योगदान मोठे

By admin | Updated: April 20, 2016 05:37 IST

देशातील आर्थिक विकासात जैन धर्मीयांचे योगदान नेहमीच मोठे राहिलेले आहे. जैन बांधव हा दान देण्यात विश्वास ठेवतो आणि त्या विचारातूनच समाजासाठी अनेक उपक्रम

मुंबई : देशातील आर्थिक विकासात जैन धर्मीयांचे योगदान नेहमीच मोठे राहिलेले आहे. जैन बांधव हा दान देण्यात विश्वास ठेवतो आणि त्या विचारातूनच समाजासाठी अनेक उपक्रम राबवित असतो. सध्या मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जैन बांधवांनी तेथील गोवंश वाचविण्यासाठी उपक्रम सुरू करावेत. या उपक्रमातून गोसेवा होईल आणि शेतकऱ्यांना मदतही होईल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जैन महामंडलच्या वतीने दादर येथे आयोजित २६१५ व्या भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाप्रसंगी फडणवीस बोलत होते. या वेळी आमदार राज पुरोहित, महामंडलाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश धाकड, समाजसेवक सुभाष रुणवाल, बी. सी. जैन, बाबुलाल बाफना, महिला अध्यक्ष कुमुद कच्छरा, चंदा रुणवाल, आर. के. जैन, बाबूलाल जैन आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. समाजातील संघर्ष संपविण्यासाठी भगवान महावीर यांच्या शाश्वत विचारांचा मार्ग अवलंबविला पाहिजे. मानव कल्याणासाठी हे विचारच प्रेरक ठरतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. भगवान महावीर यांनी पंचतत्त्वाच्या संवर्धनातून जीवन जगण्याची कला शिकविली असून, त्यांचा समावेश जीवनात करण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील अवगुणांवर मात करण्यासाठी ज्ञानाचा वापर करण्याचा संदेश भगवान महावीरांनी दिला. त्यांच्या या संदेशातूनच आत्मोन्नतीचा मार्ग दिसून येतो. भगवान महावीर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन चालले, तरच जगात शांतता राहिल, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)