शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जैन संघटना आगामी काळात शेतकरी, युवकांसाठी काम करणार

By admin | Updated: January 11, 2016 01:14 IST

पारस ओसवाल यांची माहिती : द्वैवार्षिक अधिवेशनाची सांगता

बाहुबली : मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय जैन संघटना कार्य करीत आहे. त्याची व्याप्ती संपूर्ण देशभर आहे. आगामी काळात संघटना शेती शेतकरी व युवक युवतींच्या प्रगतीसाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष व कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती पारस ओसवाल यांनी केले. ते कुभोजगिरी येथे आयोजित भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते.ओसवाल यांनी आगामी वर्षभरामध्ये राज्यामध्ये राबविल्या जाणाऱ्या विधायक कामांची कार्यपद्घती राज्यातील कार्यकर्त्यांसमोर मांडली. वेळेसोबत चालेल तो टिकेल अन्यथा तो मिटेल, त्यामुळे संघटनेच्या पदधिकाऱ्यांना त्यांनी प्रगतीसाठी नवनवीन कार्यप्रणाली अवलंबण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात संघटनेकडून ‘‘जेम्स फॉर इंडिया’’ असा नारा दिला. प्रत्येक व्यक्तिने भारतासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बीजेएस यावर्षी जैन व जैनेतर समाजासाठी विविध विधायक कार्ये घेऊन अत्यंत जोमाने कार्य करणार असल्याचे विविध राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संघटनेचे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प जैन समाजासाठी राबविण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. त्यामध्ये जैन समाजातील व्यापाऱ्यांसाठी व्यापारवृद्घी कार्यशाळा, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन, कौटुंबिक कलह निवारण्यासाठी विशेष प्रकल्प, युवक-युवतींना जोडीदार निवडण्याची पारंपरिक पद्धत बंद करून नवीन प्रथा सुरू करणे, मूल्यशिक्षणावर आधारित शिक्षणप्रणाली वाढविणे, अल्पसंख्याक कार्यशाळांचे आयोजन, आदी अनेक कार्यक्रमांचे बृहत नियोजन करण्यात आले आहे. सांगता समारंभाप्रसंगी अशोक संघवी सरेंदग जैन, हस्तिलाला बंब या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)भारतीय जैन संघटनेचा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठीचा मूल्य शिक्षणाचा शास्त्रशुद्ध प्रकल्प राज्य सरकारने स्वीकारला आहे. ३४ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी आगामी काळात होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांना मूल्यशिक्षणाचा प्रकल्प देशभरातील १४ लाख शाळांपर्यंत मोफत पोहचविण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. देशभरातील इयत्ता आठवी ते १२ वीच्या मुलांना आय.आय.एम., आय.आय.टी., आय.ए.एस., देहरादून जे.जे.आर्ट, होमीभाभा रिसर्च येथे ‘शैक्षणिक प्रबोधन सहल’ काढण्यात येणार आहे. राज्यातील विद्यापीठांशी करार करून महाविद्यालयीन युवतींचे प्रबोधन करण्याचे उद्दिष्ट.या अधिवेशनात भारतीय जैन संघटना (बीजेएस) आता संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक पुनर्वसनासाठी पुण्यात आणणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुथा यांनी महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत वाढत चाललेल्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. येत्या तीन-चार महिन्यांत २०१४ व २०१५ मध्ये आत्महत्या केलेल्या ४८०० ते ५००० शेतकऱ्यांच्या घरी जाऊन, सर्वेक्षण करून त्यांच्या मुला-मुलींना येत्या शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी आणण्याचा निर्णय या अधिवेशनात सहमतीने घेतला.