शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

सांगलीमध्ये सर्वपक्षीय समितीचे जेलभरो, 200 कार्यकर्ते ताब्यात

By admin | Updated: June 8, 2017 14:25 IST

राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने गुरुवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 8 - राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्यावतीने गुरुवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलन केले. आंदोलकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यानंतर पोलिसांनी दोनशे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व काही वेळात त्यांना सोडूनही दिले.
राज्यातील शेतक-यांच्या संपाचा गुरुवारी आठवा दिवस. सांगली जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन शेतकरी कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गुरुवारी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले होते. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ समितीचे कार्यकर्ते जमा झाले. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांच्या निषेध करुन निदर्शने करण्यात आली. शासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तेथून सर्व कार्यकर्ते चालत शेजारीच असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या आवारात गेले. पोलिस ठाण्यात कार्यकर्ते घुसू नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांना ठाण्याच्या प्रवेशद्वाजवळ रोखून धरले. तेथेही शेतक-यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी घोषणाबाजी झाली. 
 
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शिष्टमंडळाने बोराटे यांना निवेदन दिले. जोपर्यंत सरसकट शेतक-यांना कर्जमाफी दिली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला.
आंदोलनात किसान सभेचे कॉ. उमेश देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मनसेचे अमर पडळकर, जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे, कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, अवामि विकास पार्टीचे अशरफ वांकर, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, हिंद मजदूर सभेचे विकास मगदूम, सतीश साखळकर, शेतकरी संघटनेचे अशोक माने, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शेडजी मोहिते, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हरिदास पाटील, पद्माकर जगदाळे, असिफ बावा आदी सहभागी होते.
 
कडकोट बंदोबस्त
कारवाईची कोणतीही नोटीस न देता बुधवारी कॉ. उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे, अ‍ॅड. अमित शिंदे, अ‍ॅड. सुधीर गावडे यांच्यासह आठजणांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याने प्रकरण चिघळले होते. पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. त्यामुळे गुरुवारच्या जेलभरो आंदोलनात असा प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.