शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जय बेळगाव, जय कर्नाटक! काँग्रेस आमदार धीरज देशमुखांकडून घोषणा; सीमाभागात नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 07:52 IST

आमदार धीरज देशमुखांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. सध्या सीमावादाचा मुद्दा न्यायालयात आहे मात्र बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. याच सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी केले आहे. बेळगावात जात धीरज देशमुखांनी जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा केल्याने सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. 

बेळगावात राजहंस गड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना धीरज देशमुखांनी भाषण केले. मात्र भाषणाचा समारोप करताना जय शिवराय, जय महाराष्ट्र असं म्हटलं. त्यानंतर ते खुर्चीकडे जात होते परंतु पुन्हा माघारी येत त्यांनी माईकवरून जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा दिली. 

आमदार धीरज देशमुखांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. सीमावासियांच्या चळवळीबद्दल विलासराव देशमुखांचे योगदान मराठी भाषिक कधीही विसरणार नाही. पण यावर पाणी फिरवण्याचं काम धीरज देशमुखांनी केले आहे. सीमावासियांच्या भावना दुखावण्याचं काम केले. राष्ट्रीय पक्षाच्या अजेंड्यापुढे महाराष्ट्राची अस्मितेला कमीपणा दिला आहे. यापुढे महाराष्ट्रातील नेत्यांची विचार करावा. ही चळवळ मोठी आहे की पक्षाचा अजेंडा मोठा आहे याची जाण ठेऊन बेळगावात यावे अशी टीका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांनी केली आहे. 

चंद्रकांत पाटलांच्या कन्नड गाण्यावरूनही झाला होता वाद२०१८ मध्ये भाजपाचे तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील हे बेळगावात गेले असताना त्याठिकाणी एका कार्यक्रमात त्यांनी कन्नड गाणे गायले होते. हट्टी दरे कन्नड, नलली हट्ट बेकू या अभिनेता राजकुमारच्या गाण्याचे बोल पाटलांनी आळवले. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे असा होत असल्याने त्यांच्याविरोधात सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी पसरली होती. या विधानावरून वाद निर्माण झाला होता.  

टॅग्स :Dhiraj Deshmukhधीरज देशमुख