सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
शहरातील जागृत व नवसाला पावणारी म्हणून मोहटादेवी प्रसिद्ध आहे. कामधंद्यानिमित्त आलेल्या वंजारी समाजाने गावदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी 45 वर्षापूर्वी मंदिराची उभारणी केली.
उल्हासनगरने नुकतीच 66 वर्षे पूर्ण केली असून यापूर्वी येथे ब्रिटिशकालीन लष्करी छावणी होती. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर निर्वासित सिंधी समाजाला या लष्करी छावणीतील बॅरेक, ब्लॉक व खुल्या जागेत वसविण्यात आले होते. सिंधी समाजाच्या व्यापारी वृत्तीमुळे शहरातील उद्योग भरभराटीला येऊन त्यानिमित्ताने कामगारवर्ग शहरात येथे वसू लागला.
मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील वंजारी समाज कामधंद्यानिमित्त शहरात येऊन कौशलनगरात स्थायिक झाला. मात्र, जिल्ह्यातील गावदेवी, मोहटादेवी म्हणजे रेणुकामाता येथे नसल्याने त्यांना चैन पडेना. त्यामुळेच त्यांनी देवीची स्थापना करण्याचे ठरविले. नगर जिल्ह्यातील नागरिक व वंजारी समाजातील कार्यकर्ते एकत्र येऊन 1972 मध्ये मोहटादेवीच्या मंदिराची उभारणी केली. तसेच जगदंबा चॅरिटेबल ही संस्था स्थापन करून संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविणो सुरू केले.
मोहटादेवी मंदिर संस्थेच्या पहिल्या अध्यक्षाचा मान भगवान खेडेकर यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची देखरेख व उभारणी झाली आहे. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमधील मंदिरात देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवी शहरात प्रसिद्ध असून नवरात्रीत दर्शनासाठी भक्तांच्या लांबचलांब रांगा येथे लागतात. तसेच नवस फेडण्यासाठी महिलांची एकच गर्दी मंदिराबाहेर होत असल्याने संस्थेचे स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देतात. नवरात्रीदरम्यान विविध कार्यक्रमांसह मिरवणूक, भंडारा व यात्र भरत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिका:यांनी दिली. नवरात्रीला मंदिर परिसर दिव्यांनी लख्ख उजळून निघत असून देवीच्या स्थापनेला 45 वर्षे झाली आहेत. लग्न, मुंज, गृहप्रवेश आदी कार्यक्रम देवीच्या कलाशिवाय नागरिक करीत नसल्याची माहिती भाविकांनी दिली. मंदिरात 24 तास पुजारी असून येथूनच अहमदनगर व शिर्डीला जाण्यासाठी विशेष बसची सोय राज्य परिवहन मंडळाने भक्तांसाठी केली आहे.